Sunday, September 13, 2009

फूल ना फुलाची पाकळी


शुद्धी हा फुलांच्या सुगंधाचा पहिला उपयोग. सर्व रोगांच्या उत्पत्तीचे कारण मन असते व त्यामुळे मन शुद्ध, सात्त्विक व प्रसन्न झाले तर रोगपरिहार आपसूक होईल, यात काही संशय नाही.

परमेश्‍वराची पूजा करायची म्हटली, कोणालाही मान द्यायचा म्हटला, कोणाबद्दल आदर दाखवायचा म्हटला, तर कमीत कमी आवश्‍यकता असते फुलाची. "फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी अमुक तमुक देत आहे,' असा वाक्‍प्रयोगही रूढ आहे. मुळात फूल अर्पण करायचे असते. प्रत्येक फुलाचा काहीतरी उपयोग असतोच. फक्‍त एकच फूल असे आहे, की जे दिले असता मनुष्य खजील होतो व ते फूल म्हणजे "एप्रिल फूल'.

माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो।

हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्‌ ।

पूजा म्हटली की फूल आवश्‍यक असतेच. हॉस्पिटलमध्ये एखादा आजारी मनुष्य असल्यास फुलांचा गुच्छ नेला जातो. कुणाचा वाढदिवस असेल त्याला पुष्पगुच्छ देतो. मंचावर असलेल्या वक्‍त्याला वा मंचावर एखाद्याचा सत्कार करायचा झाल्यास पुष्पगुच्छ देतो. त्यामुळे पुष्पगुच्छ देणे, हा त्या व्यक्‍तीचा सन्मान असतो. फूल हे सर्वांत महत्त्वाचे. त्याबरोबरीने पुष्कळदा श्रीफळ, शाल, पैसे, भेटवस्तू वगैरे काही दिले जाते. प्रत्येक वेळी पुष्परचना केलेला गुच्छच हवा, मोठा हारच हवा, वा चार फुले हवीत असे नसते, तर एका फुलानेही काम होते.

परमेश्‍वराची पूजा करताना त्याला स्नान घालणे, चंदन, हळद-कुंकू अर्पण करणे वगैरे उपचार करायचे असतील तरी पूजेत फुलाचा मान पहिला असतो. ज्या वेळी इतर कोणतेही उपचार करायचे नसतील तेव्हा एक फूल वाहून नमस्कार केला जातो. असा आहे फुलांचा महिमा.

पुष्प म्हणजे "फूल' हा निसर्गातील एक चमत्कार आहे. बागेत खूप निगा करून वाढवलेल्या झाडाला घातलेले असते नकोसे वाटणारे शेणखत, गांडूळखत वगैरे कुठले तरी खत व पाणी. अशा बागेतल्या झाडाला किंवा कुठल्यातरी वळचणीच्या जागी उगवलेल्या रोपट्याला फूल आल्यावर मात्र लगेच तोडावेसे वाटते. फूल झाडावरच राहिले तरी आसमंतात सुगंध पसरतो. फुलाचा आत्मा सुगंधात असतो. पृथ्वीतत्त्वाचे वास्तव्य सुगंधात असल्यामुळे जणू काही झाडाला दिलेली माती, शेणखत या सर्व माध्यमांतील परमेश्‍वरी अंश सुगंध आहे व ते सुगंधाचे कण बाहेर खेचून काढण्याचे काम झाड करते व परमेश्‍वराचा वास फुलाच्या रूपाने प्रकट करते. म्हणून फुलाला एवढे महत्त्व आहे. शेजारी शेजारी दोन फुटांवर लावलेल्या दोन रोपट्यांना जेव्हा वेगवेगळ्या वासाची, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या वजनाची फुले येतात तेव्हा आपले डोके चक्रावून जाते. प्रत्येक फूल हा सृजनाचा अप्रतिम आविष्कार असतो. आपल्याला निसर्गाचा हा चमत्कार असंख्य रूपात पाहता येतो. फुले पाहताना "देता अनंत हस्ते किती घेशील दो कराने' असे जे काही म्हणतात ते अगदी खरे वाटते. अशी विविधरंगी फुले पाहिली की "तेथे कर माझे जुळती' असे शब्द आपसूक ओठांवर येतात व परमेश्‍वराला वंदन करावेसे वाटते.

दृष्टीला सुख होते हा फुलाचा पहिला उपयोग. आपल्या आसपासच्या झेंडूच्या बागा, गुलाबाच्या बागा, ऍमस्टरडॅमला ट्युलिपच्या बहरलेल्या बागा पाहिल्या की मन मोहरून उठते. आसमंतात भरून वाहिलेला सुगंध, पारिजातकाच्या झाडावर फुललेली असंख्य फुले व जमिनीवर पडलेला असंख्य फुलांचा गालिचा पाहिला की स्वर्गसुखाचा अनुभव येतो.

आजच्या ताणतणावाने भरलेल्या व सतत नुसत्या सोयी पाहणाऱ्या लोकांना बिनवासाच्या, कडक दांड्याच्या, अनेक दिवस टिकणाऱ्या गुलाबांचे आकर्षण वाटते व अशी फुले भेट देण्यासाठी उपयोगात आणणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे; पण यामागे साधतो नुसता व्यवहार.

निसर्गातील अनेकविध प्रकारच्या नैसर्गिक फुलांचा उपयोग नुसते आरोग्यच नव्हे, तर पूर्ण जीवन सुखी करण्यासाठी अनंत प्रकारे होऊ शकतो. घराच्या बागेत असलेल्या वेलींवरच्या फुलांचा सुगंध आसमंतात भरून राहिला असता मनात दुष्ट विचार येऊच शकत नाहीत. मनःशुद्धी हा फुलांच्या सुगंधाचा पहिला उपयोग. सर्व रोगांच्या उत्पत्तीचे कारण मन असते व त्यामुळे मन शुद्ध, सात्त्विक व प्रसन्न झाले तर रोगपरिहार आपसूक होईल, यात काही संशय नाही.

प्रत्येकाचा काही ना काही उपयोग असतो. आम्ही मुले लहान असताना रंगपंचमीच्या आधी काही दिवस पळसाची फुले जमवत असू. आमचे वडील ती फुले पाण्यात उकळवत असत व त्यापासून तयार झालेल्या सुंदर केशरी-पिवळ्या रंगाने आम्ही रंगपंचमी खेळत असू. अंगावर असा रंग पडल्याने पलाशपुष्पाचा उपयोग आपसूक होत असे आणि आजकालच्या रासायनिक रंगांनी जे नुकसान होते ते अनायासेच टळत असे. सध्या मिळणारे असंख्य प्रकारचे रासायनिक रंग वापरून रंगपंचमी खेळल्यास कसा त्रास होतो, हे वेगळे सांगायची आवश्‍यकता नाही.

दसरा, नवरात्र म्हटले की दारावर आंब्याची पाने व झेंडूची फुले यांचे तोरण हमखास लागले जाते. असे तोरण दारात लावल्यावर कुठल्या व्हायरसची किंवा कुठल्या दुष्ट शक्‍तीची घरात शिरण्याची बिशाद आहे? व्हायरस व दुष्ट शक्‍तींना बाहेर थोपविण्याचे काम अशा आंब्याच्या पानाच्या व झेंडूच्या फुलाच्या वासाने होते.

फुलांचा नाजूकपणा आपल्याला एखाद्या नाजूक प्रकृतीच्या व्यक्‍तीशी वा नाजूक गोष्टीशी कसे वागावे, हे शिकवतो.

फुलांचे औषधात तर अनेक उपयोग आहेत. फुलांच्या सुगंधाने मधमाश्‍या फुलाकडे आकर्षित होतात व त्या मध तर तयार करतातच; पण बरोबरीने झाडाच्या पुनरुत्पत्तीच्या कार्याला हातभार लावतात.

कमळाचे औषधी उपयोग खूप आहेत. पांढरे, लाल, निळे अशी अनेक रंगांची कमळे पाण्यात वा दलदलीत उगवतात. या सगळ्यांचे औषधी उपयोग वेगवेगळे असतात. एवढेच नाही, तर आपल्या शरीरातही सहा कमळे उमलत असतात व त्यांना चक्र अशी संज्ञा दिलेली असली, तरी त्यांचे अस्तित्व कमळाप्रमाणेच उपयोगी ठरते. अनेक देवतांना, त्यातही श्रीगणेशाला कमळ अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी तर जणू कमळातूनच बाहेर येते व कमळावरच विराजमान असते. कुठल्याही देवतेला कमळपुष्पाचे आसन दिले तर त्याहून मोठे आसन नाही.

कमळ महत्त्वाचे आहे, असे म्हणताना गुलाबाचे महत्त्व कमी होत नाही. पारिजातक, जाई, जुई, चमेली, सायली, सोनचाफा ही फुलेही तेवढीच उपयोगाची असतात. जास्वंदीच्या फुलाला खास सुगंध नसला तरी आकार व या फुलाचा मनमोकळेपणा सर्वांना आकर्षित करतो. लाल व पांढऱ्या जास्वंदीचे आयुर्वेदात उपयोग आढळतात. जास्वंदीची फुले असंख्य रंगांची आढळतात.

आयुर्वेदात सांगितलेली आसवे तयार करताना, काढे आंबवण्यासाठी (फर्मेंटेशनसाठी) फुलांचाच उपयोग केलेला असतो. अशी फुलाच्या मदतीने बनविलेली आसवेच खरी गुणकारी ठरतात. यीस्ट टाकून तयार केलेले आसव तेवढे परिणामकारक ठरत नाही.

हिरवा चाफा, कवठी चाफा यांचेही सुगंध मनमोहक असतात. रातराणीचा वास तर नाग व सर्पांनाही आकर्षित करतो, असे म्हणतात.

देशपरत्वे फुले बदलतात. हाय-वेच्या मध्ये लावलेली कण्हेरीची झाडे जशी भारतात दिसतात तशी इटलीतही दिसतात. लाल फुलांची व पांढऱ्या फुलांची, अशा कण्हेरीच्या दोन जाती असतात. आयुर्वेदाने कण्हेरीच्या फुलांचाही उपयोग सांगितलेला आहे.

धोत्र्यासारख्या झाडालाही फुले येतात. पांढरा धोत्रा व काळा धोत्रा या दोन्हींच्या फुलांचा वापर आयुर्वेदात केलेला दिसतो.

स्त्रिया फुले डोक्‍यात घालतात. सुवर्णाचे फूल डोक्‍यात घातले जात असले व स्त्री सुवर्णाचे फूल घातल्याने अधिक प्रसन्न होत असली, तरी सौंदर्य खरी नैसर्गिक फुले डोक्‍यात घालण्यानेच खुलते.

देवाला हजार, लाख फुले वाहण्याचे संकल्पही केले जातात. ज्या फुलांचा सडा पडतो अशी फुले झाडाखाली साफ-सफाई करून सारवलेल्या जमिनीवर घ्यावी, असे म्हणतात.

जाई, जुई, मोगरा ही संध्याकाळी उमलणारी फुले स्त्रियांना अतिशय प्रिय असतात. ही फुले वातावरण धुंद करायला मदत करतात.

ंफुलांचे आकारही वैविध्यपूर्ण असतात. काही फुलांना त्याच्या आकारावरूनही नाव दिलेले दिसते उदा. गायीच्या कानासारखे गोकर्ण. कैलासपतीच्या फुलाच्या खालच्या भागाची रचना महादेवाची पिंडी असल्यासारखा असतो व शेषनागाने पिंडीवर फणा धरून ठेवली आहे अशा आकारात पाकळ्यांची रचना झालेली असते. या अलौकिक रचनेवरून फुलाचे नाव सार्थक झालेले दिसते. या फुलाला अप्रतिम सुगंध असतो.

गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. काही फुले पाण्यात उकळून त्याचा वाफारा श्‍वसनरोगांसाठी उपयोगी असतो.

ज्या फुलांपासून पुढे फळे तयार होतात अशाही फुलांचे सौंदर्य व सुगंध मनमोहक असतात. ऍस्टर, डेलियासारख्या फुलांना वास नसला तरी त्यांचे सौंदर्य काही और असते.

कदंबाची फुले लक्ष्मीला प्रिय असतात व ही चेंडूसारखी गोल गरगरीत असतात व त्याच्या संपूर्ण अंगावर सुयांसारखे असंख्य धागे असतात. या फुलांचा वास खूप दूरवर पसरतो. केवड्याला अप्रतिम सुवास असतो; पण केवडा दिसतो पानासारखा. बाहेरच्या बाजूला टोकदार सुवासिक पाने व आत मधल्या दांड्याला पुंकेसर असतात. केवडा श्रीगणेशाला प्रिय असतो. केवड्यापासून बनविलेले अत्तरही सूक्ष्म असून अत्यंत लोकप्रिय आहे.

सध्या ताजी फुले मिळणे दुरापास्त होत चालले आहे व त्याचे उपयोगही कळो झाले आहेत. बाजारात मिळणारी काही फुले खरी असली तरी ती जोपासताना अशी खते व रसायने वापरली जातात, की ती कृत्रिम वाटतात. आजकाल हलके हलके प्लॅस्टिकची फुले बाजारात येऊ लागली आहेत. प्लॅस्टिकची फुले कितीही हुबेहूब दिसली तरी त्यात ना कोमलता ना सुगंध. काही प्लॅस्टिकची फुले पाहिल्यावर अशीही फुले असतात का, अशीही शंका बऱ्याच वेळा मनात येते. पण इतर देशात फिरत असता तशी नैसर्गिक फुले पाहायला मिळतात व जाणवते की परमेश्‍वराची लीला अगाध आहे व वेगवेगळ्या आकारांची, रंगांची, सुगंधांची फुले पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत. म्हणून असे वाटते, की "काळा गुलाब वा निळा गुलाब आणून दिल्यास मी लग्न करीन' असे म्हणणारी राजकन्या या पृथ्वीच्या पाठीवर असू शकेल.

डॉ. श्री बालाजी तांबे

फुलांचा औषधी उपयोग


सर्व प्राचीन संस्कृतीने सुगंधाचा, फुलांचा आरोग्याशी संबंध जोडला आहे असे दिसते. भारतीय संस्कृतीत देवदेवतांना सुगंधी पुष्प, धूप अर्पण करण्याची पद्धत पुरातन काळापासून आहेच; पण इजिप्त, चीन, जपान येथेही सुगंध, धूप या संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसते. आयुर्वेदात "पुष्पवर्ग' म्हणजे औषधी फुलांची विशेष माहिती देणारा असा वेगळा वर्ग सांगितला आहे, तर आधुनिक काळात "अरोमा थेरपी' या नावाने जगासमोर ही उपचार पद्धती आलेली आहे.

औषध म्हणून एखाद्या वनस्पतीचे पंचांग वापरावे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यात फुलांचाही समावेश असतो. मूळ, खोड वा खोडाचे साल, पाने, फळ व फूल अशी पंच-अंगे असतात. साधारणतः फूल म्हटले की सुगंध आठवतो. सुगंध हा शरीर-मनाला ताजेपणा, स्फूर्ती देणारा गुण असल्याने औषधांमध्ये फुलांचे योगदान मोठे असते. सुगंधामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत मिळते, प्रसन्नता प्रतीत होते. बहुतेक सर्व सुगंधयुक्‍त फुलांमध्ये औषधी गुणधर्म असतात, पण फारसा सुगंध नसलेलीही अनेक फुले औषधात वापरली जातात. "भावप्रकाशा'त "पुष्पवर्ग' म्हणजे औषधी फुलांची विशेष माहिती देणारा असा वेगळा वर्ग सांगितला आहे.

मोगऱ्याची फुले सुगंधी असतात. मोगऱ्याचे गजरे आजही वापरले जातात. बऱ्याच घरांत मोगऱ्याचे एखादे झाड असतेच.

मुद्‌गरो मधुरः शीतः सुगन्धिश्‍च सुखप्रदः।

कामवृद्धिकरश्‍चैव पित्तनाशकरो मतः ।।

...निघण्टू रत्नाकर

मोगऱ्याचे फूल मधुर, शीतवीर्याचे, सुगंधी व सुखप्रद असते. कामवर्धक व पित्तनाशक असते.

उष्णता वाढल्याने नाकात फोड येतो, त्यावर मोगऱ्याच्या फुलांचा नुसता वास घेतल्याने बरे वाटते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यात मोगऱ्याची फुले टाकली असता ते सुगंधी बनते व असे सुगंधी पाणी पिण्याने उष्णता कमी होण्यास मदत मिळते. मोगऱ्याचा थेंबभर अर्क बत्ताशासह सेवन केल्यास वाढलेले पित्त कमी होते व बरे वाटते.

गुलाब

गुलाबाची फुले प्रसिद्ध आहेत, पण औषध म्हणून वापरायचा देशी गुलाब गुलाबी रंगाचा, सुगंधी व कोवळ्या पाकळ्या असणारा असतो. सुगंध नसणारी गुलाबाची फुले फक्‍त शोभेची असतात.

शतपत्री हिमा हृद्या ग्राहिणी शुक्रला लघुः। दोषत्रयास्रजित्‌ वर्ण्या कट्‌वी तिक्‍ता च पाचनी ।।

...भावप्रकाश

गुलाब वीर्याने शीत असतो, हृदयासाठी हितकर असतो, शुक्रवर्धक व वर्णकारक असतो. चवीला कडू, तिखट असला तरी तिन्ही दोषांना संतुलित करणारा असतो आणि पाचकही असतो.

गुलकंद हे गुलाबाच्या फुलांपासून तयार होणारे प्रसिद्ध औषध होय. गुलकंदामुळे पित्त कमी होते, कांती उजळते, ताप, गोवर, कांजिण्या वगैरे रोगांनंतर शरीरात राहणारी कडकी दूर होते. गुलाब शौचाला साफ होण्यास मदत करतो. डोळ्यांची आग होत असता किंवा डोळे थकले असता पापण्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो.

कमळ

गणपतीला व देवीला वाहण्यासाठी कमळ वापरण्यात येते. कमळ हे एक मोठे औषध आहे.

कमलं शीतलं वर्ण्यं मधुरं कफपित्तजित्‌ ।

...भावप्रकाश

कमळ थंड, वर्ण सुधारणारे, चवीला मधुर व कफ-पित्तदोष कमी करणारे असते. लाल, पांढरे व निळ्या रंगाचे कमळ असते. कमळाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे ते हृदयाची शक्‍ती वाढवते. हृदयाची धडधड होत असता, हृदय अशक्‍त झाले असता कमळाच्या फुलाचे चूर्ण, मध, लोणी व खडीसाखर यांचे मिश्रण दिले जाते. पद्मघृतासारखा कमळापासून बनविलेला योगही हृद्‍रोगावर अतिशय उपयुक्‍त असतो. कमळाच्या फुलाचे चूर्ण मध, लोणी व खडीसाखरेसह घेण्याने स्त्रियांचे अंगावरून जाणे थांबते.

जाई

पांढऱ्या फुलांची जुई-जाईची वेल घराबाजूच्या बागेत असते.

पुष्पं सुगन्धि संप्रोक्‍तं मनोज्ञं कफपित्तनुत्‌ ।

...निघण्टू रत्नाकर

जाईचे फूल अतिशय सुगंधी, दिसायला मनोहर व कफ-पित्तशामक असते. जाईच्या कळ्या नेत्ररोग, त्वचारोग, जखमा, फोड येणे वगैरे तक्रारींवर उपयुक्‍त असतात.

जुई

सुगन्धी वातकफकृत्‌ पित्तदाहतृषापहा।

त्राश्‍मरी च त्वग्दोषं रक्‍तदोषं व्रणं तथा ।।

...निघण्टू रत्नाकर

जुईचे फूल सुगंधी असून, पित्तदोष कमी करते, दाह शमवते, तृष्णा भागवते. मुतखडा, त्वचाविकार, रक्‍तदोष, जखमा, दंतरोग, नेत्ररोग, मुखरोग, शिरोरोग वगैरेंमध्ये हितकर असते. विषाचा नाश करते, तसेच तापामध्ये हितकर असते.

सोनचाफा

चम्पक कटुकस्तिक्‍तः कषायो मधुरो हिमः ।

विषक्रिमिहरः कृच्छ्रकफवातास्रपित्तजित्‌ ।।

...भावप्रकाश

सोनचाफा चवीला गोड, तिखट, कडू व तुरट असतो. वीर्याने शीत असतो. विषदोषाचे शमन करतो, रक्‍तदोष दूर करतो. सोनचाफ्याच्या सुगंधामुळे हवा शुद्ध होते.

बकुळ

बकुळीचा मोठा वृक्ष असतो व सकाळी झाडाखाली छोट्या सुगंधी फुलांचा सडा पडलेला असतो.

तत्पुष्पं रुचिरं शीतं मध्वाढ्यं मधुरं मतम्‌ ।

सुगन्धि स्निग्धकषायम्‌ ।।

.....भावप्रकाश

बकुळीची फुले वीर्याने थंड व गोड सुगंधाची असतात, रुची वाढवतात, चवीला मधुर व तुरट असून, गुणाने स्निग्ध असतात. लहान बालकाला खोकला झाला असता बकुळीची फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी गाळून घेऊन ते पाणी प्यावयास देतात. बकुळीची ताजी फुले खडीसाखरेसह खाल्ल्यास व वरून थंड पाणी प्यायल्यास हलणारे दात मजबूत होतात, असे सांगितले जाते.

मेंदीची फुले

मेंदीची फुले थंड असतात व त्यांना विशेष असा मादक सुगंध असतो. डोके दुखण्यावर मेंदीच्या फुलांचा चांगला उपयोग होताना दिसतो. मेंदीची फुले ठेचून तयार केलेला काढा दूध व साखरेसह घेतल्यास डोकेदुखी कमी होते. मेंदीची पाने वाटून केसाला, तळहातांना व तळपायांना लावल्याने रंग छान दिसतो व शरीरातील उष्णता कमी होते.

आंब्याचा मोहर

आंब्याचा मोहर सुगंधी असतो. वसंतात आंब्याचा मोहर आला की वातावरण सुगंधी होते. स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आंब्याचा मोहर तुपात तळून खायला दिला जातो.

डाळिंबाचे फूल

डाळिंब हे फळ म्हणून सर्वांना माहिती असते, पण डाळिंबाच्या फुलाची कळी- म्हणजेच अनारकली अतिशय सुंदर दिसते. डाळिंबाच्या फुलाचा रस नाकात टाकला असता उष्णतेमुळे नाकातून पडणारे रक्‍त बंद होते.

धायटी

धायटीची फुले लाल रंगाची असतात. गर्भाशयाच्या रोगांवरचे हे एक मोठे औषध समजले जाते. धायटीच्या फुलांचा काढा घेतल्यास योनीवाटे अतिरक्‍तस्राव होणे थांबते. गर्भधारणा होण्यासाठीही धायटीची फुले सहायक असतात. धायटीची फुले आसव-अरिष्टे बनविण्यासाठी वापरली जातात, यामुळे संधानप्रक्रिया व्यवस्थित होते.

जास्वंद - जपाकुसुम

जास्वंदीची फुले केसांसाठी उत्तम असतात. जास्वंदीची फुले वाटून किंवा रस काढून केसांना लावला असता केसांची वाढ होते व केस काळे होतात. चाई लागली असता त्या ठिकाणी जास्वंदीच्या फुलांचा रस चोळण्याचा फायदा होतो.

पळस

"पळसाला पाने तीन' अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. पळसाच्या वृक्षाला लाल रंगाची फुले येतात. पळसाची फुले लघवी साफ होण्यासाठी उत्तम असतात. लघवी अडली असल्यास किंवा थांबून थांबून होत असल्यास पळसाची फुले वाफवून ओटीपोटावर बांधली जातात. पळसाच्या फुलांचे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घेण्यानेही लघवीला साफ होण्यास मदत मिळते.

मोह

मोह नावाचे मोठे वृक्ष असतात. मोहाची फुले अतिशय सुंदर व मंद सुगंध असणारी असतात. मोहाच्या फुलांचाही आसव-अरिष्टे बनविण्यासाठी वापर केला जातो. मोहाची फुले थंड व पौष्टिक असतात. मोहाची फुले व खडीसाखरेपासून गुलकंदाप्रमाणे मोहकंद तयार केला जातो. या मोहकंदामुळे कडकी नष्ट होते व शक्‍ती वाढते.

शेवगा

शेवग्याच्या शेंगेप्रमाणे शेवग्याच्या फुलांची रुचकर भाजी केली जाते. शेवग्याची फुले चवीला तिखट, वीर्याने उष्ण व डोळ्यांना हितकर असतात. वातरोग, सूज, जंत, प्लीहावृद्धी वगैरे विकारांवर शेवग्याची फुले उत्तम असतात.

या प्रकारे पृथ्वीच्या सौंदर्यात भर घालण्यात अग्रणी असणारी फुले आरोग्यासाठीही महत्त्वाची असतात.

इतिहासाकडे पाहिल्यास सर्व प्राचीन संस्कृतींत सुगंधाचा, फुलांचा आरोग्याशी संबंध जोडल्याचे लक्षात येते. भारतीय संस्कृतीत देवदेवतांना सुगंधी पुष्प, धूप अर्पण करण्याची पद्धत पुरातन काळापासून आहेच, पण इजिप्तच्या इतिहासातही सुगंध, धूप या संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसते. चीन, जपान वगैरे देशांतही देवदेवतांची स्तुती करण्यासाठी सुगंधाचा वापर केला जात असे.

आयुर्वेदात सुगंधाचा, सुगंधी फुलांचा आरोग्याशी संबंध असतो, हे दाखविणारे असंख्य उल्लेख आहे. आधुनिक काळात "अरोमा थेरपी' नावाने जगासमोर आलेली उपचार पद्धती आयुर्वेदातील सुगंध-उपचाराचाच एक भाग आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये.
डॉ. श्री बालाजी तांबे

Wednesday, September 2, 2009

महत्वपूर्ण दूध

लहानपणापासून मातृ-दूध व गाईचे दूध घेतल्यास पुढच्या आरोग्याचा पाया भक्कम तयार होतो. पण अलीकडच्या काळात दूधदुभते न मिळाल्यामुळे माणसाला आरोग्य पारखे झालेच; पण त्याचबरोबर चुकीचे दूध सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दिसू लागले आहेत.

अ लीकडे लोकांना चरबी वाढण्याची भीती वाटू लागली. वजन वाढेल या भीतीमुळे अनेकांनी दूधदुभत्याकडे वाकडी नजर केली, तरी ठिकठिकाणच्या शिवमंदिरांत महादेवावर दुधाचा अभिषेक मात्र चालू राहिलेला दिसतो. पाऊस पडला नाही म्हणून महादेवाच्या मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरायचा असे सर्व गावकऱ्यांनी ठरविले व दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी सर्वांनी एक एक लोटा दूध गाभाऱ्यात ओतायचे हे पण ठरले. अशा प्रकारे महादेवाला संकटात टाकले, की पाऊस येईल ही सर्वांची अपेक्षा होती. ठरलेल्या दिवशी पुजाऱ्याने दुधात बुडालेला महादेव दिसेल अशा अपेक्षेने सर्वांच्या उपस्थितीत पहाटे मंदिर उघडले, तेव्हा दिसले, की महादेव पाण्यात बुडालेला आहे. पूर्ण गाभारा पाण्याने भरलेला आहे. सर्व जण दूध टाकणार आहेतच, आपण एक लोटा पाणी टाकले, तर फार काही बिघडणार नाही असा विचार सर्वांनी केला व सर्वांनीच एक एक लोटा पाणी टाकले होते.

एकूण काय तर दुधात पाणी टाकायचे वा पाण्यासारखे दूध प्यायचे ही सवय लोकांना फार पूर्वीपासून लागली असावी. दुधात बोट घालून वर काढल्यावर बोट पांढरे दिसावे, म्हणजे बोटाला सर्व बाजूंनी दूध चिकटले तर ते दूध चांगले असते. साधारण दुधात ४-४.५ टक्के फॅट असली, तर ते दूध चांगले मानले जाते. दुधाचे भाव तर वाढत राहिले आहेतच; पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होत होत दोन टक्‍क्‍यांवर आलेले आहे. त्यामुळे दूध तापवल्यावर त्यावर पातळ कागदासारखी साय येते असे दिसते. लोक असेच दूध सेवन करू लागल्याचे दिसते. अधिक प्रमाणात फॅट असलेले दूध प्रकृतीला अहितकर असते; कारण त्यामुळे शरीरातील चरबी वाढते, असा सोईस्कर गैरसमज रूढ होऊ लागला. दूध नसलेले पांढरे पाणी वा पावडर (नॉन डेअरी प्रॉडक्‍ट्‌स) टाकल्यावर चहाला रंग आणण्याची शक्कल काही मंडळींनी शोधून काढली. प्रतिष्ठित पंचतारांकित हॉटेलमध्ये वा विमानप्रवासात असे नॉन डेअरी प्रॉडक्‍ट्‌स दिले जाऊ लागल्यावर काही मंडळींनी रसायने वापरूनच दूध बनविण्याचा प्रयत्न सुरू केला. या सर्वांमुळे चहाला पांढरा रंग येण्याआधी डोळे पांढरे होण्याची वेळ आली. अशी परिस्थिती आल्यावर मात्र लोकांचे डोळे उघडले. हे दूधदुभत्याचे काय नाटक सुरू आहे हे भगवानच जाणे.

ज्या वेळी ताजे दूध मिळत असे, त्या दुधावर बोटभर जाडीची साय येत असे. जेव्हा लोक लस्सी जाड मलई टाकून घेत असत, मलईचे श्रीखंड, मलईचा खवा, मलईचे पेढे व कणीदार तूप खात असत तेव्हा माणसे धष्टपुष्ट होती, रोगही त्यामानाने सोपे होते. मथुरा, वृंदावन या बाजूला सकस दुधाचा एवढा छान व्यापार होता, की त्या दुधावर पोसलेले मल्ल रस्त्यातून जाऊ लागल्यावर हल्ली एखादा भारी वजन असलेला ट्रक रस्त्यातून गेला, की घरात जसा अनुभव येतो तसा अनुभव येत असे. आता ते दूधदुभते गेले व मल्लही गेले. आज रोगांचे प्रमाण अतोनात वाढलेले दिसते. औषधपाण्याच्या खर्चाने ट क्कल पडेल असे वाटत असले, तरी दूधदुभत्याचा अभाव हेच टक्कल पडण्याचे मुख्य कारण आहे. ताज्या दुधाबाबत एक अडचण असते, की काढल्यावर काही तासांच्या आत ते तापवावे लागते, अन्यथा ते नासते. त्यामुळे पहाटे उठून गाई-म्हशींचे दूध काढायचे व गिऱ्हाइकांना पुरवायचा हा एक मोठा द्राविडी प्राणायाम असतो. पूर्वी ताजे दूध बाटल्यांतून येत असे तेव्हा सकाळी लवकर उठून दूध केंद्रांवरून दूध आणून लगेच तापवणे हे एक नित्याचे काम असे. कपडे धुवायला मशिन, कणीक मळायला मशिन, जिना चढायला लिफ्ट अशा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या तसतसे लोकांना सकाळी उठून दूध आणायला जाणे अवघड होऊ लागले. शहरांची अतोनात वाढ झाल्यामुळे गाई-म्हशी राहत्या वस्तीपासून दूरवर गेल्या, पर्यायाने दूधदुभतेही माणसापासून दूर गेले. त्यामुळे दूध अधिक कसे टिकेल याचे प्रयत्न होऊ लागले. महिनोन्‌ महिने न तापवता खोक्‍यात टिकणारे दूध तयार झाले; पण हेच दूध सेवन केल्यावर महिनोन्‌ महिने न पचता पोटात राहू लागले. कच्च्या दुधावरचे क्रीम काढून घेऊन त्यापासून पुढे सर्व पदार्थ बनवून सामान्यांना उपलब्ध करून देणे हा व्यवसाय सुरू झाला. दुधाचा महापूर आल्यासारखे वाटले, तरी सामान्यांना खरे दूधदुभते दुर्मिळ झाल

े. उपलब्ध असलेल्या दुधाचा शरीराला काडीमात्र उपयोग राहिला नाही.

दुधात प्राणिज एन्झाईम्स असल्याने दूध वाळवणे खूप अवघड असते; पण काही विशिष्ट पद्धतीने दुधाची पावडर बनवणे सुरू झाले. या दुधाच्या पावडरपासून बनविलेले दूध पचणे अवघड असते. दूध तापवून वेगळ्या केलेल्या सायीला विरजण लावून लोणी व त्यापासून तूप बनविणे ही खरी लोणी व तूप बनविण्याची भारतीय पारंपरिक पद्धत आहे. दही बन विण्यासाठी वापरलेला संस्कार म्हणजे विरजण प्राणिज बॅक्‍टेरिया असलेले असणे आवश्‍यक असते. दूध-तुपाची शुद्ध म्हणून जाहिरात केली गेली व ते तसे असले तरीही मुळात बनविण्याच्या प्रक्रियेची शुद्धता पाळणे टाळले जाऊ लागले. गुरांना भलतेच खाद्य देणे, नंतर दूध थोडेसे तापवून क्रीम काढून घेणे, त्या क्रीमवर प्रक्रिया करून लोणी-तूप वगैरे बनविणे हेच मुळात चुकीचे व अशुद्ध म्हणावे लागेल. या सर्व क्रिया रासायनिक पद्धतीने सुरू झाल्या, ज्यामुळे सर्व प्रक्रिया चटकन होऊ लागल्या व त्यापासून बन विलेल्या लोणी-तुपाचे दुर्गुणही लक्षात येईनासे झाले; पण असे पदार्थ सेवन केल्यावर त्याचे दुष्परिणाम होणे अटळ होते.

दूधदुभते न मिळाल्यामुळे माणसाला आरोग्य पारखे झालेच; पण त्याचबरोबर चुकीचे दूधदुभते सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दिसू लागले. खाल्लेल्या अन्नाचे शक्‍तीत रूपांतर होईपर्यंत जी सप्तधातूंची वाढ होणे अपेक्षित असते ती वाढ न होता, असंतुलन होऊन रोग वाढीला लागले. रोगांची लक्षणे दूर होतील अशी औषधे शोधली गेली; पण रोग आटोक्‍यात येईनासे झाले. लहानपणापासून मातृ-दूध व गाईचे दूध घेतल्यास पुढच्या आरोग्याचा पाया भक्कम तयार होतो. पायाच भक्कम नसेल म्हणजे शरीर, हाडे, शुक्र वगैरे कमकुवत राहिली, तर शरीररूपी इमारतीला डागडुजी करून त्या घरात शांतपणे राहता येणार नाही.

डॉ. श्री बालाजी तांबे

खूप काही सांगत असते जांभई...

आपण जाम कंटाळलो किंवा वैतागलो की एखादी लांबलचक जांभई देतो. झोप अनावर होऊ लागली की एकापाठोपाठ एक जांभई देत राहतो. आपण आवरू म्हटले तरी आवरता येत नाही जांभया देणं. पण नुसती एवढीच कारणं नसतात जांभई देण्यासाठी.

लहान मूल झोपेतही जांभई का देतं? किंवा आपण भरपूर झोपून उठलो की लगेच तीन - चार जांभया का देतो? यामागची कारणे दोन असतात. मूल झोपेतही जांभई देतं ते आपल्या अवयवांना व्यायाम देण्यासाठी. आपणही चेहऱ्याच्या अवयवांना ताण देत व्यायामच देत असतो. त्याच वेळी शरीरात जमा झालेले दूषित वायू बाहेर फेकत असतो. काही वेळा शरीराला पुरेसा ऑक्‍सिजन मिळाला नाही किंवा शरीरात दूषित वायूचे प्रमाण वाढले तरी जांभया येतात. अशा वेळी काही जणांना चक्कर आल्यासारखेही वाटू शकते. कुत्रा, मांजर, वाघ, सिंह असे प्राणीही याच कारणांसाठी जांभया देतात. ही आपल्याला ज्ञात असलेली कारणे झाली. लीड्‌स विद्यापीठातील डॉ. कॅटरिना मॉरिसन यांना मात्र जां भई देणे ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची चुगली करणारी गोष्ट वाटते. एखाद्याला पाहता पाहता जांभई दिली जाणे हे सामाजिक समानुभूतीचे लक्षण आहे. एखाद्याने जांभई दिली की त्याच्या आसपासचेही जांभया देऊ लागतात, त्यामागे मनोवैज्ञानिक कारण आहे. दुसऱ्याच्या अनुभूतीशी स्वतःला जोडून घेणे ही आपलीच मानसिक गरज असते. जांभई देताना आणि दुसऱ्यांविषयी विचार करताना आपल्या मेंदूचा विशिष्ट भाग सक्रिय होतो. एखाद्याला टाळण्यासाठी जशी आपण जांभई देतो, तशी एखाद्याविषयी असणारी आस्थाही व्यक्त होण्यासाठी जांभईच देतो, असे डॉ. मॉरिसन यांच्या संशोधनात आढळले आहे.

अन्नयोग

अन्नाची रुची वाढवण्यासाठी हरित म्हणजे कच्च्या स्वरूपात काही पदार्थांचे सेवन करता येते. मात्र हरित वर्गातली द्रव्ये व फळे वगळता इतर सर्व भाज्या, धान्ये अग्निसंस्कार करून मगच सेवन करायला हवीत.

कोशिंबीर म्हणून किंवा अन्नाची रुची वाढवण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हरित वर्गाची आपण माहिती घेत आहोत. ही सर्व द्रव्ये ताजी वापरायची असतात व योग्य प्रमाणात कच्ची खाल्ली तरी चालण्यासारखी असतात.

गाजर

गृज्जनं मधुरं तीक्ष्णं तिक्‍तोष्णं दीपनं लघु ।

संग्राहि पक्‍तपित्तार्शो ग्रहणीकफवातजित्‌ ।।

...भावप्रकाश

गाजर चवीला गोड असले तरी गुणाने उष्ण-तीक्ष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. गाजर पित्तज मूळव्याध, संग्रहणी मध्ये पथ्यकर असते तसेच कफदोष व वातदोषात हितकर असते.

गाजराचा कोशिंबीर म्हणून वापर करणे चांगले असते. त्यातही ते शिजवून खाणे अधिक चांगले असते, मात्र आजकाल रूढ होत असलेली गाजराचा रस पिण्याची पद्धत चांगली नाही कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, त्वचारोग बळावतात, मलावष्टंभ होऊ शकतो.

कांदा

पांढरा व लाल असे कांद्याचे दोन प्रकार असतात. दोघांचे वेगवेगळे गुणधर्म आयुर्वेदात दिलेले आहेत

श्‍वेतः पलाण्डुर्बल्यः स्यात्‌ स्वादुर्वृष्यो गुरुः कटुः ।

रुच्यः स्निग्धः कफकरो धातुवृद्धिकरो मतः ।।

निद्राकरो दीपकः स्यात्‌ क्षयहृद्रोगनाशनः ।

...निघण्टु रत्नाकर

पांढरा कांदा बलदायक, चवीला गोड, तिखट व पचायला जड असतो, शुक्रधातूला वाढवतो, रुची वाढवतो, स्निग्ध गुणाचा असतो, अग्निसंदीपन करतो, झोप येण्यास मदत करतो व क्षयरोग, हृदयरोग, मूळव्याध, उलटी, रक्‍तविकार वगैरे रोगात हितकर असतो.

बाह्यतः वापरला असता कांदा थंड असतो म्हणून उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोक्‍यावर टोपीच्या आत कांदा ठेवण्याची पद्धत दिसून येते. तापात हाता-पायांची जळजळ होते तेव्हाही कांद्याचा कीस बांधण्याचा उपयोग होतो. नाकातून रक्‍त पडल्यास नाकात कां द्याच्या रसाचे २-३ थेंब टाकले जातात.

लाल कांदा

गुरुः कटुश्‍च मधुरः किंचित्‌ उष्णश्‍च पित्तलः ।

वृष्यो बलकरः प्रोक्‍तः कफं वातं च शोथकम्‌ ।।

अर्शः कृमीन्नाशयतीत्येवं प्रोक्‍ता गुणाः खलु ।।

..निघण्टु रत्नाकर

पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा थोडा उष्ण असतो, चवीला तिखट गोड असणारा लाल का ंदा पचायला जड असतो, पित्तकर असतो, मात्र कफ-वातदोषांचे शमन करतो, का मोत्पादक असतो, ताकद वाढवतो, मूळव्याध, जंत व सूज यांचा नाश करतो.

अन्नाची रुची वाढवण्यासाठी कांद्याचा योग्य प्रमाणात वापर करता येतो, मात्र कांद्यामध्ये उत्तेजित करण्याचा स्वभाव असल्याने कच्चा कांदा अतिप्रमाणात, विशेषतः रात्री खाणे टाळणे चांगले असते. शुक्रदोष असणाऱ्यांनी किंवा झोपेत वीर्यप्रवर्तन वगैरे त्रास असणाऱ्यांनी रात्री कच्चा कांदा किंवा दह्यासह कांद्याची कोशिंबीर वगैरे खाणे टाळावे असा वृद्धवैद्याधार आहे.

लसूण

लसणाचे वैशिष्ट्य असे, की त्याच्यात षड्रसांपैकी आंबट रस सोडला तर बाकीचे पाचही रस आहेत. म्हणून संस्कृतमध्ये लसणाला रसोन (रस+उणे) असे म्हणतात.

लसणाचा कंद तिखट असतो, पाने कडू असतात, दांडा तुरट तर दांड्याचे टोक खारट असते, बीज मधुर असते. योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे लसूण खाण्याने अनेक फायदे होऊ शकतात.

लशुनं पाककाले च रसकाले कटु स्मृतम्‌ ।

रसायनं गुरुं प्रोक्‍तमुष्णं वृष्यं च वीर्यदम्‌ ।।

तीक्ष्णं स्निग्धं पाचकं च भग्नसन्धानकारकम्‌ ।

पित्तलं कण्ठ्यं च रक्‍तकोपकरं मतम्‌ ।।

...निघण्टु रत्नाकर

लसूण चवीला तिखट तसेच विपाकानेही तिखट असतो, वीर्याने उष्ण व पचायला जड असतो पण शुक्रधातू वाढवतो, लसूण रसायन गुणांनी युक्‍त असतो.

लसूण गुणांनी स्निग्ध व तीक्ष्ण असतो, पाचक असतो, तुटलेले हाड सांधण्यासाठी उत्तम असतो, घशासाठी हितकर असतो, पित्त वाढवतो आणि रक्‍तप्रकोप करवतो. वातश मनासाठी लसूण हे एक मोठे औषध असते. तुपात तळलेला लसूण प्रकृतिनुरूप योग्य प्र माणात खाणे आमवात, संधिवात व इतर वातविकारात हितकर असतो. मात्र लसूण तीक्ष्ण व पित्तकर असल्याने कच्चा खाणे अयोग्य समजले जाते. लसणाच्या पातीची हिरवी चटणी किंवा लसणाची कोरडी चटणी ऋतू व प्रकृतीचा विचार करून खाता येते. त्यातही एका पाकळीचा लसूण औषधी गुणांनी श्रेष्ठ असतो. जुलाब उलट्या होत असता, रक्‍तस्राव होत असता तसेच गर्भवती व बाळंतिणीने लसूण खाऊ नये.

अशा प्रकारे आयुर्वेदाने हरित म्हणजे कच्च्या पदार्थांचा वेगळा वर्ग सांगितला आहे. यावरून एक गोष्ट अजून लक्षात येऊ शकते की इतर सर्व भाज्या शिजवून खाणे अपेक्षित असते. कच्च्या दुधीचा रस पिणे, कारल्याचा रस पिणे किंवा भाज्या न शिजवता सॅलड म्हणूून कच्च्याच खाणे अपेक्षित नाही. कोशिंबीर म्हणून हे पदार्थ खातानाही काही विशिष्ट द्रव्यांसह खायचे असतात, उदा. काकडीची कोशिंबीर करताना त्यासह दाण्याची पूड मिसळली जाते. हरित वर्गातली द्रव्ये व फळे सोडता इतर सर्व भाज्या, धान्ये अग्निसंस्कार करून मगच सेवन करायला हवीत.

डॉ. श्री बालाजी तांबे

Monday, August 3, 2009

शरीराची निगा

चेहरा व मस्तक यांना मालिश केल्याने त्वचेचे व केसांचे आरोग्य वाढते. पुरेशी झोप घेणे, नियमित दिनचर्या, जागरणे टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्वचेच्या तुकतुकीतपणासाठी भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी, आंबा, लिंबू, आवळे, टोमॅटो, गाजर, कडधान्ये इत्यादी 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश हवा.

त्वचा हे संपूर्ण शरीराचे आवरण आहे. शरीराचा हा अवयव सर्वाधिक दर्शनीय असल्यामुळे सर्वप्रथम नजरेत भरतो. त्वचा हे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. इतर ज्ञानेंद्रिये नसली तरी माणूस जगू शकतो; पण त्वचेशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणूनच अपघाताने भाजल्यावर किती टक्के त्वचा जळाली याचा उल्लेख केला जातो. त्वचेमुळे शरीरातील जलसंतुलन होते. शरीराचे तापमान टिकून राहते. बाहेरील जिवाणू-विषाणूंपासून शरीराचे संरक्षण होते. सर्व ऋतूंमध्ये तसेच वयोमानपरत्वे त्वचेची निगा राखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केले पाहिजे.

त्वचा ही आतून सजीव आणि बाहेरून निर्जीव असते. निर्जीव बाह्य आवरणामुळेच कुठलेही जंतू त्यावर तग धरू शकत नाहीत. याला अपवाद मात्र काही फंगसचा (बुरशीचा) असतो. त्वचेवर असंख्य रंध्रे असतात. त्वचेमध्ये तेलग्रंथी ऊर्फ सिबॅशियम ग्लॅंड्‌स असतात. त्या त्वचेवर तेलाचे आवरण निर्माण करतात. याशिवाय त्वचेवर पुरुषांमध्ये नऊ आणि स्त्रियांमध्ये दहा द्वारे असतात. त्वचेमधील सर्व रंध्रे तसेच द्वारांमधून आतील पदार्थ बाहेर येऊ शकतात आणि बाहेरील पदार्थ व घाण आत जाऊ शकते. त्वचेच्या निगेमध्ये मुख्यतः या रंध्रद्वारांच्या स्वच्छतेचा विचार व्हायला हवा.

त्वचा, डोळे, कान, नाक इत्यादी ज्ञानेंद्रिये तसेच तोंड, मूत्रमार्ग, मलमार्ग याची स्वच्छता नियमितपणे करायला हवी. अस्वच्छता हे वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण ठरते. स्वच्छतेविषयी सजगता बाळगताना शरीर हे सतत दुर्गंधीयुक्त पदार्थ बाहेर टाकत असते, हे लक्षात येते. त्यामुळे काही वेळा काही जण "अतिस्वच्छते'च्या आहारी जाऊन झपाटल्याप्रमाणे दिवसातून अनेकदा शरीर स्वच्छ ठेवण्याच्या मागे असतात. शरीर जराही मळलेले त्यांना सहन होत नाही. अस्वच्छता जशी वाईट; तशीच स्वच्छतेची सततची चिंताही वाईट. अस्वच्छतेने शारीरिक आजारपणे येतात, तर अति स्वच्छ राहण्याच्या स्वभावाने मानसिक संतुलन बिघडते. त्यासाठी शरीर हे सतत अस्वच्छ होणारे यंत्र आहे हे लक्षात ठेवून योग्य वेळी योग्य ती स्वच्छता करणे आवश्‍यक आहे.

जीवनाचा आरोग्यखेळ

खेळामुळे नुसतेच आरोग्य मिळते असे नव्हे, तर खेळकरपणा व आनंदीपणा वाढतो, एक-दुसऱ्याला सहन करण्याची शक्‍ती मिळते, पराजय पत्करण्याची शक्‍ती मिळते; पण सध्या खेळसुद्धा छोटे छोटे करत आणले आहेत.

पूर्वी माणसे शे-पाचशे वर्षे जगत असत. अलीकडे शंभर-सव्वाशे वर्षे जगलेली माणसे आढळतात; पण एकंदरीतच मध्यंतरीच्या काळात मनुष्याची आयुर्मर्यादा खूप कमी झालेली होती. आता आधुनिक काळात पुन्हा आयुर्मर्यादा वाढलेली आहे. पण सध्या मनुष्याचे नुसते अस्तित्व अधिक काळ टिकून राहिलेले दिसते. आयुर्मर्यादा वाढली आहे असे म्हणताना मनुष्य मात्र वार्धक्‍याने पीडित झालेला, स्मृतिरहित, काही काम करता येत नाही असा व परस्वाधीन असलेला दिसला तर काय उपयोग? एकूणच काय, तर सध्या मनुष्याचा आकार व आयुष्यमान दोन्ही कमी झाल्यासारखे दिसते. का कोण जाणे, पण माणसाच्या मनात विचार आला, की सर्व गोष्टी छोट्या छोट्या कराव्यात. त्यामुळे छोटे रेडिओ, मिनी टेलिफोन, मिनी कॅमेरा असे सगळी छोटे छोटे तयार झाले. इथपर्यंत सर्व ठीक होते. परंतु इस्टंट व्यायाम, पटकन वजन उतरवणे, पटकन सिक्‍स पॅक स्नायू तयार करणे, झटकन खाणे, अशा तऱ्हेचे शॉर्ट कट्‌स मारून तयार झालेली प्रकृती आरोग्यदायी किंवा जीवनाला योग्य दिशा देणारी असेल असे वाटत नाही.

जीवनातील महत्त्वाचा विभाग म्हणजे खेळ. जीवन हा शंकर-पार्वतीने मांडलेला सारिपाटाचा खेळ आहे असे म्हणतात. तो जर यशस्वी करायचा असेल, तर माणसाने हसत-खेळत जीवन जगावे व खेळांना महत्त्व द्यावे. आपण म्हणतो, "जरा या लहान मुलाला खेळवणार का?' तेथपासून आपल्या आयुष्यात खेळ सुरू होतात. लहान मूल आपल्याबरोबर खेळते, मोठे होत असताना ते अनेक प्रकारचे खेळ करते, या खेळामुळे नुसतेच आरोग्य मिळते असे नव्हे, तर खेळकरपणा व आनंदीपणा वाढतो, एक-दुसऱ्याला सहन करण्याची शक्‍ती मिळते, पराजय पत्करण्याची शक्‍ती मिळते. पण सध्या खेळसुद्धा छोटे छोटे करत आणले आहेत. पूर्वी पाच दिवस चालणारी क्रिकेटची मॅच सध्या एक दिवसावर आलेली आहे. आता तर केवळ २०-२० म्हणजे फक्‍त प्रत्येक संघाने केवळ २० ओव्हर टाकून मॅच खेळली जाते व तेवढ्यातच प्रेक्षकांनी व खेळाडूंनी आनंद घेणे अपेक्षित असते. यात खेळ किती दिसेल हे माहीत नाही; पण या २०-२० मुळे पैशाचे गणित मात्र खूप मोठ्या आकड्यापर्यंत पोचलेले दिसते. या सर्व टीम्सना विकत घेणारी माणसे खूप पैसे देतात व पैसे कमावतात.

माणसाच्या लहान झालेल्या जीवनाला कुणी तरी विकत घेऊन माणसांना रात्रंदिवस कामाला लावून काही मोजकी माणसे पैसे कमावतात. त्यामुळे गरीब-श्रीमंतांतील दरी वाढत जाते व असे करत करत जीवनाचा खेळ २०-२० ओव्हर्सवर येऊन बसलेला आहे. म्हणजे वयाची चाळिशी गाठेपर्यंतच मनुष्याला रक्‍तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्मृतिविभ्रंश असे नाना तऱ्हेचे रोग त्रास देऊ लागतात. ज्या वेळी जो संघ खेळेल त्याने कुठल्या चुका करू नयेत व कुठल्या चुका कराव्यात, जेणेकरून निदान हा २०-२० ओव्हरचा जीवनाचा खेळ आनंदमय होऊन त्यात जिंकता येईल व पुन्हा पुढच्या चाळीस वर्षांसाठी मनुष्याचे आरोग्य नीट तयार होईल, अशा कल्पना डोक्‍यात धरून साधारणतः अगदी कमीत कमी शब्दांत, कमीत कमी नियमांत सांगायचे म्हटले तरी २० नियम डोळ्यांसमोर दिसत होते. त्यातून २०-२० ओव्हर्सची, २०-२० पाळ्यांची कल्पना आली. कुठले २० नियम खेळातून आउट करतात, कुठले २० नियम पाळले असता जीवन यशस्वी होते व जीवनाची मॅच जिंकता येते, याची एक यादी तयार केली.

पावसात भिजू नये, थंडी-वाऱ्यात बाहेर फिरू नये, उंचावरून उडी मारू नये हे साधारणतः प्रत्येकाला माहितीच असते. व्यसने वगैरेंची साथ धरल्यास आपल्याला जीवनयात्रा अर्ध्यावर संपवावी लागेल याची कल्पना साधारण प्रत्येकाला असते. या गोष्टी टाळल्या तरी सकाळी रोज उशिरा उठणे, प्रकृतीला न मानवणारे अन्न-पाणी सेवन करणे, अतिमैथुन, नेहमी अति उत्तेजित अवस्थेत राहणे, सतत शृंगार वा मैथुनाचा विचार करणे, न पचणारे जडान्न खाणे, व्यसन करणे ही प्रतिष्ठा आहे असे समजून एखाद्या व्यसनाच्या आहारी जाणे, अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चूक झाल्यास खेळाडू नक्कीच आउट होतो.

निरामय दीर्घायुष्य जगणाऱ्या मंडळींनी काही सोपे सोपे नियम आत्मसात केलेले असतात. लवकर झोपून लवकर उठण्याचा नियम पाळताना ते जीवनामधील कुठल्याच आनंदाला वंचित होत नाहीत. खूप थकवा आला असल्यास सुखशय्येवरसुद्धा झोप नीट लागत नाही. तेव्हा प्रत्येकालाच लवकर निजे, लवकर उठे.... याचे पालन करण्यास काय अडचण असावी?

स्वतःच्या प्रकृतीला मानवेल असे अन्न खाण्यात किंवा सामिष अन्न टाळण्यात काय अडचण असावी? मांसाहार करून आलेल्या ताकदीचा वापर तरी कोठे करणार? खेळाडू, घोडेस्वार, पोलिस, ताकद आवश्‍यक असणारा व्यवसाय करणारी मंडळी सामिष आहार करतील तर ते समजण्यासारखे आहे; पण सरसकट सर्वांनीच मांसाहार करून का म्हणून आयुष्य खराब करून घ्यावे? मेंदूचे विकार वा कर्करोगासारखे आजार असणाऱ्यांनी तर मांसाहार केला असता आपली जीवनयात्रा लहान करण्याचे ठरविलेले दिसते..

सोप्या सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास जीवनाची २०-२० ओव्हर्सची मॅच अत्यंत यशस्वीरीत्या पार करून पुन्हा २०-२० ओव्हर्स खेळायची संधी मिळू शकते. मल-मूत्रविसर्जन नीट होणे खूप आवश्‍यक असते व त्याकडे लक्ष देण्यासाठी आधुनिकता वा जुनाट विचार यांचा परिणाम होण्यासारखा नसतो. भरपूर पाणी पिण्याने आरोग्य नीट राहत असले तर भरपूर पाणी पिण्याला प्रत्यवाय कुठला असावा? पाण्याऐवजी रासायनिक द्रव्ये असलेली बाटलीतील एरिएटेड पेये का प्यायची?

तेव्हा २०-२० ची पारी व्यवस्थित पूर्ण करायची असली तर सोपे सोपे नियम पाळणे आवश्‍यक आहे, असे केल्याने जीवनाचा खेळ आनंदाने जगताही येईल.

आयुर्वेद म्हणजे जुन्या लोकांनी, जुन्या वेळेला कुठलेही प्रयोग न करता सिद्ध केलेली विद्या आहे असे डोक्‍यात धरून आयुर्वेदाने सांगितलेल्या सूचना न पाळता व आपण आधुनिक आहोत असे समजून वागले तर जीवनयात्रा नक्कीच लवकर संपेल. क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा पूर्वीच्या वेळी होऊन गेलेल्या मोठ्या खेळाडूंच्या चुका व कसब, त्यांच्या खेळातील प्रावीण्य यांचा विचार आजही केला जातो. असे असताना या खेळाडूंना जुनाट म्हणता येईल का? त्यांनी तयार केलेल्या खेळाच्या पद्धतीचा व त्यामुळे त्यांनी मिळविलेल्या प्रावीण्याचा अभ्यास करून खेळात सुधारणा करता येईल.

रोग आल्यास औषधे घेतानासुद्धा आधी रोगाची पूर्ण कल्पना करून घेणे आवश्‍यक असते. शरीर व रोग हे एकमेकाचे शत्रू आहेत असे समजण्यास हरकत नाही, रोगसंप्राप्ती झाली असता, दोन्ही बाजूंचे संख्याबल, दोन्ही बाजूंच्या सैनिकांजवळ असलेली आयुधे यांचा विचार न करता लढलेले युद्ध कधीच जिंकले जात नाही. शरीराची व रोगाची संपूर्ण माहिती मिळवून, त्यावर काही घरगुती उपचार करता येतात का ते पाहून त्यानंतर रोग न हटल्यास योग्य औषधे घेऊन रोग समूळ नष्ट करायला काय अडचण असावी?

शत्रू आपल्याला दिसू नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली वा शत्रू आपल्याला दिसणार नाही याची खबरदारी घेतली तर युद्धात आपण जिंकले जाऊच असे नव्हे, उलट पट्टी बांधून झोपलेल्या मनुष्यावर शत्रू येऊन केव्हा घाला घालेल व गळा कापेल हे समजणारही नाही. रोगावर मुळातून उपचार न करता केवळ लक्षणे मिटवण्यावर भर देऊन डोळ्यांवर पट्टी बांधून बसणे कितपत योग्य आहे?
डॉ. श्री बालाजी तांबे


जीवनसंगीत

'आरोग्यसंगीता'चा उपयोग केल्याने नुसते वैयक्‍तिकच नव्हे; तर एकूण वातावरणाचे, सर्व सृष्टीचे व निसर्गाचे संतुलन होईल. म्हणजे आरोग्यसंगीमुळे नुसते रोगनिवारण न होता संपूर्ण विश्‍वात आरोग्यसंतुलनाचा अनुभव घेता येईल.

संगीत म्हणजेच जीवन. सर्व विश्‍वाची उत्पत्ती नादापासून झालेली आहे आणि स्वर-ताल यांची एक अप्रतिम रचना म्हणजे हे जीवन! या जीवनात स्वर वा ताल बिघडला तर आनंद मिळत नाहीच पण एकूणच जीवन नकोसे वाटते. संगीताचेही असेच असते. संगीतामध्ये सूर व तालाला खूप महत्त्व असते. संगीत जोपर्यंत स्वरात व तालात सुरू असते तोपर्यंत ते कर्णमधुर असते. जीवनात प्रत्येक व्यक्‍ती कुठल्यातरी सृजनाचा आनंद घेत असते तसेच संगीतात कविता मिसळली जाते तेव्हा ते संगीत पूर्णत्वाला पोचते. मनुष्यमात्रामध्ये वा प्राणिमात्रांमध्ये असंतुलनातून रोगोत्पत्ती होते. असंतुलनामुळे हृदयाचा ठोका चुकतो, वातावरणाचे संतुलन बिघडते वा एकूणच जीवनाची घडी विस्कटते असे म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदानुसार प्रज्ञापराधामुळे रोग होतो असे समजले जाते. स्वर, ताल व कविता यांचे असंतुलन म्हणजे प्रज्ञापराध. मनुष्याच्या बाबतीत विचार केला असता शरीर, मन व आत्मा यांचा एकमेळ होत नाही तेव्हा होतो प्रज्ञापराध व त्यातून उत्पन्न होतो रोग.

संगीत जर जीवनाशी एवढे समरस झालेले असेल, जीवन म्हणजेच संगीत असेल तर असंतुलन दूर करण्यासाठी संगीताचा अवश्‍य उपयोग व्हावा. ज्यावेळी मनुष्यमात्रांचे आरोग्य व्यवस्थित असते, जीवनात चालणाऱ्या कार्यामुळे ध्येयाकडे वाटचाल होत असते व सर्व जीवन ऋतुचक्रानुसार चालू राहते तेव्हा जीवन म्हणजे संगीत आहे याचा प्रत्यय येतो. ही संकल्पना लक्षात आल्यास जीवनातल्या असंतुलनासाठी संगीताने उपचार करता येतात हे आपल्याला पटू शकते.

मन व संगीताचा संबंध भारतीय शास्त्राने शोधला. एका विशिष्ट तऱ्हेने स्वरांची योजना करून मनाची पकड कशी घेता येईल याचा विचार केला व यातून "राग' निर्माण झाले. मनाचा भाव वा मानसिकता बदलण्याचे काम राग करतात. त्यामुळे मनाचे रंग रागामुळे बदलतात. स्वरमालिकेची विशिष्ट पकड म्हणजे राग अशी आपण रागाची परिभाषा करू शकतो. त्यामुळे रागसंगीत वा रागावर आधारित संगीत ऐकल्यावर मनाचा रंग बदलतो यात काही नवल नाही. संगीताचा उपयोग नुसताच मनाचा रंग बदलणे वा मनाला दुःखातून आनंदाकडे नेणे एवढा मर्यादित नाही.

जीवनाचे कार्य नीट चालावे असे वाटत असेल तर संपूर्ण रोगनिवृत्ती व्हावीच लागेल व त्यासाठी रोग बरा करत असताना शरीरातील कुठल्या भागात रोग आहे, शरीराच्या कुठल्या भागाचे काम नीट होत नाही किंवा वात-पित्त-कफाचे असंतुलन कोठे झालेले आहे व ते दूर कसे करता येईल याचा विचार करावा लागतो. संगीत शरीरातील सर्व नाड्यांमधून प्रवाहित करून विशिष्ट अवयवापर्यंत पोचविण्याचे काम कवितेने म्हणजे शब्दांनी केले जाते. शब्द योग्य तऱ्हेने उच्चारण्यासाठी श्‍वासाचे गणित सांभाळणे व विशिष्ट आघात करून कंठातून योग्य नाद उत्पन्न होणे आवश्‍यक असते.

शरीरातील सर्व नाड्या (मेरिडिअन) विशिष्ट अवयवांना जोडलेल्या असतात. या सर्व नाड्या शब्दोच्चारामुळे छेडल्या जातात. उदा. ओठामधून जाणारी चेतनानाडी "प'वर्गाचे सर्व शब्द स्पंदित करते. या "प'वर्गाला पाच प्रकारे श्‍वासाचे चलनवलन जोडल्याने प-फ-ब-भ-म हा "प'वर्ग तयार होतो. ह्याचप्रमाणे सर्व स्वर व व्यंजनांची उत्पत्ती होते. या स्वर व व्यंजनांची विशिष्ट प्रकारे रचना करून त्याला रागसंगीतात बसवले तर शरीर, मन व आत्म्याचे आरोग्य संतुलित करता येते. म्हणजेच संगीत जीवनाला संतुलित करण्यासाठी उपयोगी पडते.

आरोग्य प्राप्त होईल या हेतूने मनुष्यमात्राला शरीराची, शरीराच्या संतुलनाची व असंतुलनाची माहिती करून देणे व एकूणच जीवन संगीतमय करणे असा "फॅमिली डॉक्‍टर' चा उद्देश आहे. आरोग्यशिक्षण सर्वांपर्यंत पोचावे या दृष्टीने "फॅमिली डॉक्‍टर'ने प्रयत्न केले. त्यात उपचारांच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून दिली. आयुर्वेद हा सर्वसमावेशक असल्याने आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य कसे मिळवता येईल यावर भर दिला. प्रत्येकाला आवश्‍यक असणारी औषधे व उपचार कधी मिळू शकतात तर कधी मिळू शकत नाहीत पण संगीताद्वारे केले जाणारे उपचार प्रत्येकाला सहजपणे व स्वस्तात उपलब्ध असतात, त्यासाठी खर्चही अत्यल्प येतो. म्हणून आपल्या पूर्वजांनी सकाळी जात्यावर म्हणायच्या ओव्यांपासून ते रात्री झोपेपर्यंत संगीताचा भरपूर वापर केलेला दिसतो. संगीत हे कुणी अभंगात कुणी आर्येत, कुणी स्तोत्रात तर कुणी मंत्रात बसवले. वेदकाळापासून आद्य शंकराचार्यांपर्यंतच्या काळात पाहिल्यास असे लक्षात येते की बहुतेक सर्व संगीतरचना मनुष्यमात्राचे शारीरिक, मानसिक व आत्मिक आरोग्य नीट करण्यासाठी तयार केल्या गेलेल्या होत्या. ह्या काव्यरचना वा मंत्ररचना कशा गाव्या? याचे शास्त्रही तयार केले गेले.

बहुतेकांना कल्पना असते की संगीतामुळे प्राणिमात्रांवर परिणाम होतो. गावात असलेले उंदीर बासरी वाजवून बाहेर नेल्याची कथा आपणा सर्वांना माहीत आहे. संगीतामुळे पाऊस पाडल्याच्या किंवा संगीतामुळे दगडाला पाझर फोडल्याच्या गोष्टीही आपल्याला माहीत असतात.

संगीताचा उपयोग पृथ्वीच्या पाठीवर सर्व मनुष्यमात्राने, लहानथोरांनी, सर्व धर्मांनी व सर्व प्रकारच्या सामाजिक व्यवस्थांनी करून घेतलेला दिसतो. प्रार्थना ही जीवनाचा जणू पाया असल्यासारखी सर्व जगभर प्रसिद्ध आहे. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने संगीतप्रार्थनेने दिवसाची सुरुवात करावी, रात्री झोपताना प्रार्थना करावी, प्रार्थनेद्वारे देवाला आळवून देवाला प्रसन्न करून घ्यावे ही कल्पना मानवजातीत रुजलेली दिसते. हा देव दुसरा तिसरा कोणी नसून तो शरीर, मन व आत्म्याचे जेथे संतुलन असेल म्हणजेच जेथे प्रसन्नता असेल तेथे देव अवतरतो. आयुर्वेदानेही "प्रसन्नात्मेन्द्रियमनाः' असे म्हणून आरोग्यदेवतेची उपासना सांगितलेली आहे.

सध्याच्या संगीतात ताल असल्यासारखा वाटतो पण त्यात ताल नसतो, तसेच यात स्वर असतात पण राग नसतो. काळाबरोबर कितीही आधुनिकता आली तरी बेताल, बेसूर व कर्कश नाद जीवनाचे संतुलन करू शकत नाही.

संगीतामुळे रोगनिवारण पुनश्‍च आपल्या जीवनात यावे ह्या गोष्टीचा विचार करून "फॅमिली डॉक्‍टर'च्या ३००व्या अंकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी "आरोग्यसंगीता'च्या मैफिलीचे आयोजन करण्याचे ठरले. जे जे भावसंगीत, भक्‍तिसंगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, भजनसंगीत असे जे संगीत आज उपलब्ध आहे त्यातील काही रचनांचा उपयोग करून श्रोत्यांपर्यंत ही संकल्पना पोचविण्याच्या दृष्टीने "आरोग्यसंगीता'च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले.

"संगीताने जीवनसंतुलन' ही संकल्पना राबवत असताना संगीततज्ज्ञ, गायक व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्रितपणे यावर पुन्हा एकदा चिंतन, प्रयोग, संशोधन करणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारचे आरोग्यसंगीत समाजाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या मंडळींनी घेतल्यास खूप मोठे कार्य होईल. पूर्वीच्या काळी सकाळी घरोघरी गात जाणारा वासुदेव, प्रभातफेऱ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी व ठिकठिकाणी सकाळ-संध्याकाळ एकतारीवर भजने म्हणणारी मंडळी समाजाचे व वातावरणाचे संतुलन करत असत ही माहिती आपल्या सर्वांना आहेच.

"आरोग्यसंगीता'चा उपयोग केल्याने नुसते वैयक्‍तिकच नव्हे तर एकूण वातावरणाचे, सर्व सृष्टीचे व निसर्गाचे संतुलन होईल. म्हणजे आरोग्यसंगीमुळे नुसते रोगनिवारण न होता संपूर्ण विश्‍वात आरोग्यसंतुलनाचा अनुभव घेता येईल.

आजच्या "आरोग्यसंगीता'च्या कार्यक्रमातील संगीताद्वारे जीवन संतुलन करण्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचावे ही अपेक्षा !

डॉ. श्री बालाजी तांबे

Wednesday, July 8, 2009

स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वाटतंय? काळजी करू नका...

सविता, वय वर्षे ४२, सध्या तिला सतत काहीतरी विचित्रच घडतंय असं वाटतंय, बोलताना शब्द आठवत नाहीत, ठरवलेल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, कधीकधी तर अगदीच "ब्लॅंक' झाल्यासारखं वाटतं, स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वाटतंय. कशामुळे हे बदल होत आहेत?

वरील सर्व तक्रारी या ४२ ते ५४ या वयोगटातील स्त्रियांना कमी जास्त प्रमाणात जाणवत राहतात. यामागील कारण शोधण्यासाठी लॉस एंजल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. गेल ग्रीनडेल यांनी ४२ ते ५४ वयोगटांतील स्त्रियांची बुद्धिमत्ता चाचणी घेतली. या चाचणीत त्यांची बौद्धिक क्षमता, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीचे भान इ. विषयांची परीक्षा घेतली गेली.

त्यातून त्यांनी निष्कर्ष काढला, की ऋतुनिवृत्ती येण्याच्या काळात काही मर्यादित कालावधीसाठी आकलनक्षमता कमी होते. काही स्त्रियांमध्ये सुरवातीच्या काळात तर काहींमध्ये त्यादरम्यान हे बदल घडू लागतात. स्मृतिभ्रंशाचे प्रमाण प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळे आढळून आले; पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतुनिवृत्तीचा काळ संपल्यानंतर मात्र बौद्धिक क्षमता पूर्ववत झालेली आढळून आली. त्यामुळे या वयोगटातील स्त्रियांना आपल्याला स्मृतिभ्रंश होतोय की काय, असं वाटत असेल तर ते तत्कालीक आहे आणि काही दिवसांनी सर्व काही सुरळीत होईल असं समजण्यास हरकत नाही.

सौजन्य :ई-सकाळ

Saturday, July 4, 2009

What is Ayurveda? - Simple Definition



Ayurveda is a wholistic system of medicine from India that uses a constitutional model. Its aim is to provide guidance regarding food and lifestyle so that healthy people can stay healthy and folks with health challenges can improve their health. There are several aspects to Ayurveda that are quite unique:

Its recommendations will often be different for each person regarding which foods and which lifestyle they should follow in order to be completely healthy. This is due to it's use of a constitutional model.

Everything in Ayurveda is validated by observation, inquiry, direct examination and knowledge derived from the ancient texts. It understands that there are energetic forces that influence nature and human beings. These forces are called the Tridoshas. Because Ayurveda sees a strong connection between the mind and the body, a huge amount of information is available regarding this relationship.

Ayurveda is an intricate system of healing that originated in India thousands of years ago. We can find historical evidence of Ayurveda in the ancient books of wisdom known as the Vedas. In the Rig Veda, over 60 preparatison were mentioned that could be used to assist an individual in overcoming various ailments. The Rig Veda was written over 6,000 years ago, but really Ayurveda has been around even longer than that. What we see is that A yurveda is more than just a medical system

Aloe Vera: The Ayurvedic Miracle Plant



Aloe vera has been one of the most important plants used in folk medicine. The Egyptians referred to aloe as the "plant of immortality" and included it among the funerary gifts buried with the pharaohs. The healing benefits of aloe were recognized in the ancient Indian, Chinese, Greek, and Roman civilizations. It is traditionally used to heal wounds, relieve itching and swelling, and is known for its anti-inflammatory and antibacterial properties.

Aloe Vera, or Ghrit Kumari in Sanskrit, is a member of the lily family and is very cactus-like in its characteristics. It is one to two feet tall; and its leaves are succulent, broad at the base and pointed at the tips, with spines along the edges. These fat leaves contain the clear healing gel that is 96% water. The other four percent contains 75 known substances including Vitamins A, B, C, E, calcium, amino acids for protein building, and enzymes used in the digestive system.

There are over 240 species of aloe, however only 3 or 4 of them have medicinal properties; the most potent one is Aloe Vera Barbadenis. Native to North Africa and Spain, this plant now also grows in the hot dry regions of Asia, Europe and America.

External Applications

The healing effect of aloe results from its ability to prevent injury to epithelial tissues, and promote healing of injured tissues. An epithelium is a layer of cells that covers the body. Our largest epithelium is the skin and one of the main applications of aloe vera is to soothe a variety of skin ailments such as mild cuts, insect stings, bruises, poison ivy and eczema. It also has antibacterial and antifungal qualities, and increases blood flow to wounded areas. In addition, aloe vera stimulates fibroblasts, the skin cells responsible for wound healing and the manufacture of collagen, the protein that controls the aging process of the skin and wrinkling. The skin absorbs aloe vera up to four times faster than water; it appears to help the pores of the skin open and receive the moisture and nutrients of the plant.

Due to its soothing and cooling qualities, Ayurveda recommends aloe vera for a number of skin conditions --

  • Light burns and wounds: Cut off an aloe leaf and apply the gel several times a day.(It is advisable to consult a health professional in the event of any injury)

Internal Applications

In addition to the skin, other epitheliums in our body include the lining of the gut, the bronchial tubes and the genital tract, which also benefit from the healing effect of aloe vera. When taken internally, aloe vera juice aids the digestion and absorption of nutrients, helps control blood sugar, increases energy production, promotes cardiovascular health, improves liver function, and boosts the immune system.

  • For balancing digestion and elimination: Take 1 tablespoon aloe vera gel in the morning on an empty stomach. Aloe helps clear the toxins out of the digestive system, facilitates digestion and improves the functioning of the kidneys, liver and gall bladder. The anti-inflammatory fatty acids in aloe alkalize the digestive juices and prevent acidity-a common cause of indigestion. These fatty acids benefit not only the stomach but the small intestine and the colon as well.
  • Skin problems: Since aloe vera purifies the body and aids liver function, it is beneficial for the skin when taken internally. Take 1-2 teaspoons fresh aloe gel daily for young and healthy skin.

Note: Pregnant women and children under five should not take aloe vera internally.


Friday, July 3, 2009

Ayurved:अन्नयोग

रोजच्या आहारात असाव्यात अशा बऱ्याचशा फळभाज्यांचे गुणधर्म आपण पाहिले. आज आपण प्रकृती व दोषांचा विचार करून मग सेवन कराव्या अशा काही भाज्यांची माहिती पाहणार आहोत.

वांगे

वृन्ताकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च दीपनम्‌ ।

अपित्तलं लघु क्षारं शुक्रलं ज्वरनाशनम्‌ ।।

...निघण्टु रत्नाकर

वांगे चवीला गोड, स्वादिष्ट असले तरी गुणाने तीक्ष्ण असते, वीर्याने उष्ण असते, तसेच विपाकाने तिखट असते. पचायला हलके असले तरी क्षारयुक्‍त असते. थोड्या प्रमाणात खाल्ले तर पित्तकर नसते, शुक्रप्रवर्तक असते.

वांगे तीक्ष्ण, उष्ण व विपाकाने तिखट असल्याने रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असते, असा वृद्धवैद्याधार आहे.

ढोबळी मिरची

नावाप्रमाणे मोठी असणारी ही भाजी मिरचीचाच एक प्रकार आहे. चवीला तिखट, कडवट असणारी ही भाजी पित्त-वातकर असते. शरीरात रुक्षता वाढविणारी असते. त्यामुळे वाताचा त्रास असणाऱ्यांनी, आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी शक्‍यतो ही भाजी खाणे टाळणे उत्तम. त्वचाविकार असणाऱ्यांनी किंवा अंगावर पित्त उठण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनीही ढोबळी मिरची नियमितपणे खाऊ नये.

गवार

बाकुचीशिम्बिका रुक्षा वातला मधुरा गुरुः ।

सरा कफकारी चाग्निदीपनी पित्तनाशिनी ।।

... निघण्टु रत्नाकर

गवारीच्या शेंगा गुणाने रुक्ष, तसेच पचायला जड असतात. चवीला गोड असल्या तरी वातदोष वाढवणाऱ्या असतात. सारक असतात. कफ वाढवितात. कोवळ्या असताना योग्य प्रमाणात खाल्ल्या असता अग्निदीपन करतात व पित्तदोष कमी करतात.

गवारीच्या शेंगा जून झाल्या असता अधिकाधिक कोरडेपणा वाढवणाऱ्या होतात. त्वचारोगात, वातरोगात, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असताना गवार खाणे टाळणे चांगले.

घेवडा / फरस बी

ग्रामजा वातला रुच्या तुवरा मधुरा मता ।

मुखप्रिया कण्ठशुद्धिकारिणी ग्राहिणी मता ।।

... निघण्टु रत्नाकर

घेवडा वात वाढवतो. चवीला गोड-तुरट असून, रुचकर असतो. घेवड्याच्या कोवळ्या शेंगा कंठशुद्धी करण्यास मदत करतात. मलप्रवृत्ती बांधून ठेवण्यास मदत करतात. मात्र जून शेंगांमुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

वाताचा त्रास असणाऱ्यांनी घेवडा काळजीपूर्वक खावा.

कोबी - फ्लॉवर

या भाज्यांचा ग्रंथात पक्का उल्लेख सापडत नाही, पण या भाज्यांच्या सेवनामुळे पोटात वायू धरतो, असा अनेकांचा अनुभव असतो. मूत्रासंबंधी काहीही तक्रार असताना या भाज्या अपथ्यकर ठरतात. आकार मोठा व्हावा म्हणून वापरली जाणारी खते, पानांना कीड लागू नये म्हणून वरून फवारली जाणारी रासायनिक द्रव्ये यांचा परिणाम या भाज्या धुतल्या, शिजवल्या तरी जाऊ शकत नाही. शिवाय या प्रकारच्या अनैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले कोबी, फ्लॉवर निःसत्त्वही असतात. म्हणून सहसा बाजारात मिळणारे मोठ्या आकाराचे व सहज कीड लागू शकणारे कोबी- फ्लॉवर अपथ्यकर समजावे लागतात.

भूमिछत्र - मश्रूम

आजकाल मश्रूम खूप प्रचलित झाल्याचे दिसते. आयुर्वेदाच्या ग्रंथात मश्रूमला "भूमिछत्र' म्हटलेले आहे.

सर्वे संस्वेदजाः शीता दोषलाः पिच्छिलाश्‍च ते ।

गुरवश्‍छर्द्यतीसार- ज्वरश्‍लेष्मामयप्रदाः ।।

... भावप्रकाश

सर्व प्रकारचे मश्रूम दोषवर्धक, बुळबुळीत, चिकट असतात. ते पचायला जड असून त्यामुळे उलटी, जुलाब, ताप किंवा इतर कफविकार उत्पन्न होऊ शकतात. त्यातल्या त्यात स्वच्छ ठिकाणी उगवलेले मश्रूम थोडे कमी दोषकारक असतात. जमिनीवर, लाकडावर, झाडावर, तसेच गोमयाच्या ढिगावर मश्रूम उगवतात, असाही उल्लेख भावप्रकाशात आहे. काही मश्रूम विषारीही असतात. खाण्यास योग्य मश्रूम पारखून घेणे आवश्‍यक असते. कारण मश्रूममध्येही चिकटपणा, जाडपणा वेगवेगळा असतो.

एकंदरच मश्रूममुळे ताकद मिळत असली तरी ते एक प्रकारचे जडान्न असल्याने अपथ्यकरच समजले जातात.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगांची भाजी करण्याची पद्धत नसली तरी आमटीत, पिठल्यात शेवग्याच्या शेंगा टाकणे पथ्यकर असते.

शिम्बी चास्याग्निदीपनी ।

तुवरा स्वादु मधुरा कफपित्तज्वरक्षयान्‌ ।

कुष्ठशूलश्‍वासगुल्मनाशिनी च प्रकीर्तितः ।।

... निघण्टु रत्नाकर

शेवग्याच्या शेंगांमुळे अग्नीचे दीपन होते. चवीला स्वादिष्ट असणाऱ्या या शेंगांमुळे कफ-पित्तदोषाचे शमन होते. क्षयरोग, ताप, त्वचारोग, शूल, दमा, गुल्म वगैरे व्याधींमध्ये शेवग्याच्या शेंगा हितकर असतात.

एकंदर वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी, जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे चांगले असते.

शेवग्याच्या फुलांचीसुद्धा भाजी केली जाते. ती डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त असते.



अन्नयोग - कंद

आपल्या आहारात कंद हवा. मग ते गाजर असो वा सुरण; बटाटा असो वा रताळे. मात्र आपल्या आहारातील कंदाचे पथ्यापथ्य समजून घेऊन त्याची निवड करा.

आपण आत्तापर्यंत फळभाज्या तसेच पालेभाज्यांची माहिती घेतली. आज आपण कंद स्वरूपात तयार होणाऱ्या भाज्यांची माहिती घेणार आहोत.

सुरण

उपवासासाठी चालणाऱ्या काही मोजक्‍या भाज्यांमध्ये सुरणाचा अंतर्भाव होतो. सुरणाचे कंद खूप मोठे असू शकतात.

सुरणो दीपनो रुक्षः कषायः कण्डुकृत्‌ कटुः ।

विष्टम्भी विशदो रुच्यः कफार्शः कृन्तनो लघु ।

विशेषात्‌ अर्शने पथ्यः प्लीहगुल्मविनाशनः ।।


...भावप्रकाश

सुरण चवीला तुरट असतो, विपाकाने तिखट असतो. इतर सर्व कंदमुळांपेक्षा पचायला सोपा असतो. सुरण अग्निदीपन करतो, रुक्षता वाढवतो, तसेच अवष्टंभकर असतो. कफज मूळव्याधीत विशेष पथ्यकर असतो. प्लीहा वाढणे, गुल्म तयार होणे वगैरे व्याधींत हितकर असतो.

सुरणामध्ये खाज निर्माण करण्याचा दुर्गुण असतो. तो घालविण्यासाठी सुरणाचे तुकडे चिंचेच्या पाण्याने धुतले जातात किंवा चिंचेच्या पाण्यासह उकळायचे असतात.

सुरण वाफवून तयार केलेली भाजी मूळव्याधीमध्ये, विशेषतः कंड सुटणाऱ्या मूळव्याधीमध्ये हितकर असते. मात्र त्वचारोगात तसेच रक्‍तपित्तामध्ये सुरण अपथ्यकर समजले जाते.

बटाटा

काहींच्या मते बटाटा ३००-४०० वर्षांपूर्वी भारतात आला. आयुर्वेदात पिण्डालुक, आलुक, रक्‍तालु वगैरे अनेक प्रकारचे कंद वर्णन केलेले आहेत, तसेच आलुकाचे सामान्य गुणही वर्णन केलेले आहेत. हे बटाट्याला चपखल बसणारे आहेत.

आलुकं शीतलं सर्वं विष्टम्भी मधुरं गुरु ।

सृष्टमूत्रमलं रुक्षं दुर्जरं रक्‍तपित्तनुत्‌ ।

कफानिलकरं बल्यं वृष्यं स्वल्पाग्निवर्द्धनम्‌ ।।


...भावप्रकाश

सर्व प्रकारचे आलुक म्हणजे बटाटे वीर्याने थंड असतात, चवीला गोड असतात, पचायला जड असतात, मल-मूत्र होण्यास सहायक असतात, कफकर तसेच वातकर असतात. रक्‍तदोष, पित्तदोषात हितकर असतात, ताकद वाढवतात, शुक्रधातू वाढवतात व काही प्रमाणात अग्निसंदीपन करतात.

या ठिकाणी बटाटा वातकर सांगितला असला तरी तो उकडून मिरी, जिरे, आले वगैरेंसह खाल्ला तर वात वाढताना दिसत नाही. तळलेल्या बटाट्यामुळे मात्र वात वाढू शकतो. अग्नी मंद असताना बटाटा खाल्ला, तर पचनसंस्थेत थोडा वात वाढताना दिसला तरी बटाट्यामुळे चवळी, वाटाणा, चण्याप्रमाणे वात वाढत नाही, असा अनुभव आहे.

रताळे

आयुर्वेदात रक्‍तालु नावाने ओळखले जाणारे रताळेही उपवासासाठी चालते.

आलुकी बलकृत्स्निग्धा गुर्वी हृत्कम्पनाशिनी ।

विष्टम्भकारिणी तैले तलिता।तिरुचिप्रदा ।।


...भावप्रकाश

रताळे स्निग्ध असते, ताकद वाढवते, पचायला जड असते, हृदयाची धडधड कमी करते, मलावष्टंभ करू शकते व तळून खाल्ले असता खूप रुचकर लागते.

रताळे उकडून खाणे चांगले असते; मात्र भूक न लागणाऱ्या व्यक्‍तींनी रताळे विचारपूर्वक खावे. प्रमेह, मधुमेह, स्थूल व्यक्‍तींनीही रताळे शक्‍यतो टाळावे.

गाजर

गृज्जनं मधुरं तीक्ष्णं तिक्‍तोष्णं दीपनं लघु ।

संग्राहि पक्‍तपित्तार्शो ग्रहणीकफवातजित्‌ ।।


...भावप्रकाश

गाजर चवीला गोड असले तरी गुणाने उष्ण-तीक्ष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. गाजर पित्तज मूळव्याध, संग्रहणीमध्ये पथ्यकर असते, तसेच कफदोष व वातदोषात हितकर असते.

गाजराचा कोशिंबीर म्हणून वापर करणे चांगले असते. त्यातही ते शिजवून खाणे अधिक चांगले असते. मात्र आजकाल रूढ होत असलेली गाजराचा रस पिण्याची पद्धत चांगली नाही. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, त्वचारोग बळावतात, मलावष्टंभ होऊ शकतो.

डॉ. श्री बालाजी तांबे

Ayurved:उपवासातून आरोग्य

प्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा.

उपवास, व्रतवैकल्ये वगैरे गोष्टी धार्मिक, आध्यात्मिक समजल्या जातात; पण उपवास हा एक उपचार प्रकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. उपवास हा लंघनाचा एक प्रकार असतो.

लघुभोजनं उपवासो वा लंघनम्‌।।

...चरक चिकित्सास्थान

(हलका आहार किंवा उपवास म्हणजे काही न खाणे हे लंघन होय.)

आयुर्वेदात लंघनाची व्याप्ती बरीच मोठी आहे. उपवास हा लंघनाचा एक भाग झाला; पण शरीरशुद्धी, व्यायाम, सूर्यस्नान, वायुसेवन, पाचन हे सुद्धा लंघनाचेच प्रकार होत. म्हणूनच लंघनाचे जे काही फायदे आहेत ते योग्य प्रकारे केलेल्या उपवासाने मिळू शकतात.

"लाघवकरं कर्मं लंघनम्‌' म्हणजे हलकेपणा आणणारे ते लंघन अशी लंघनाची व्याख्या असल्याने उपवास केल्यास शरीर हलके होणे अपेक्षित आहे हे समजते. उपवासातून आरोग्य हवे असेल, तर हा उपवास आयुर्वेदातील लंघन संकल्पनेला धरून असायला हवा.

लघुभोजनं उपवासो वा।।

...चरक विमानस्थान

हलके भोजन किंवा उपवास म्हणजे काही न खाणे, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय आहेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणजेच उपवासातून आरोग्य मिळवायचे असणाऱ्याने आपल्या प्रकृतीनुसार उपवासाचे स्वरूप ठरवणे अपेक्षित आहे.



महाभूतांचे संतुलन

उपवासामुळे किंवा लंघनामुळे शरीरात आकाश, वायू व अग्नी महाभूतांचे संतुलन होते व यातून पुढील गोष्टी साध्य होतात -

शरीराचे जडत्व दूर होते.

अतिरिक्‍त कफदोष कमी होतो.

प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषाचे पचन होते.

अग्नी प्रदीप्त होतो.

आयुर्वेदात "आमदोष' अशी एक संकल्पना मांडली आहे. जठराग्नीची ताकद कमी पडल्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊ शकले नाही, की त्यापासून जो अर्धवट कच्चा रस तयार होतो तोच आमदोष होय. हा आम मुख्यत्वे आमाशयाच्या आश्रयाने राहतो; पण जर त्याचे वेळेवर पचन केले नाही, तर तो सर्व शरीरात पसरून अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करतो. आमदोषाचे रोगकारित्व इतके जबरदस्त असते, की "आमय' हा रोगाला पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो, तर जेथे आम नाही ती निरामय, निरोगी अवस्था समजली जाते. शरीरात आमदोष तयार झाला, की मलमूत्राचा अवरोध तयार होतो, ताकद कमी होते, शरीराला जडपणा येतो, आळस प्रतीत होतो, तोंडाची चव नष्ट होते, मळमळते, पोटात दुखते, चक्कर येते, अधोवायूला- शौचाला दुर्गंधी येते, आंबट ढेकर येतात.

अशा प्रकारे अनेक प्रकारची त्रासदायक लक्षणे निर्माण करणारा आमदोष वाढला असता, काहीही न खाता उपवास करणे अपेक्षित असते. यामुळे आम पचायला मदत मिळते. विशेषतः आमामुळे ताप आला असता किंवा आमामुळे अजीर्ण झाले असता काहीही न खाता उपवास करणे उत्तम असते.

अर्थात, आमदोष वाढून त्रास होण्यापर्यंत थांबण्याची आवश्‍यकता असते असे नाही. आठवड्यातून एकदा संध्याकाळचे जेवण न घेण्याची सवय लावून घेतली, तर त्यामुळे आमदोष तयार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अग्निसंस्कार केलेले म्हणजे उकळलेले पाणी पिणे हेही आमदोष तयार न होण्यासाठी उत्तम असते.

प्रकृतीला हितावह उपवास

काही न खाता उपवास हा आमदोष पचविण्यासाठी उपयुक्‍त असला, तरी सरसकट सगळ्या प्रकृतीसाठी असा कडक उपवास हितावह ठरेलच असे नाही. विशेषतः दिवसभर किंवा अनेक दिवस फक्‍त फळे खाणे, नुसते दूध पिणे किंवा नुसते पाणीच पिणे अशा प्रकारचा उपवास सर्वांना मानवणारा नसतो. विशेषतः पित्त वा वातप्रधान प्रकृतीमध्ये पचण्यास हलके अन्न खाऊन उपवास करणेच अधिक योग्य असते.

योग्य पद्धतीने उपवास करण्याने लाभणारे काही फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत -

विमलेंद्रियता, मलानां प्रवृत्तिः, गात्रलघुता, रुचिः, क्षुत्तृषोरेककालमुदयः, हृदयोद्गारकण्ठानां शुद्धिः, रोगामार्दवमुत्साहः तन्द्रानाशश्‍च।

सर्व इंद्रिये शुद्ध होतात.

मल-मूत्र-स्वेद आदी मलांचे प्रवर्तन यथायोग्य होते.

शरीरावयवात हलकेपणा प्रतीत होतो.
तोंडाला रुची येते.

तहान व भूक हे एकाच वेळी अनुभूत होतात.

शुद्ध ढेकर येतात.

घसा मोकळा वाटतो.

हृदयात हलकेपणा प्रतीत होतो.
रोग असल्यास रोगाचा जोर कमी होतो.

उत्साह उत्पन्न होतो.

झापड नाहीशी होते.

साळीच्या लाह्या, मुगाची डाळ, भाजलेले तांदूळ, ज्वारी-बाजरीची भाकरी, दुधी भोपळा, घोसावळी, दोडके, पडवळ, कारले वगैरेंपैकी साधी भाजी, ताक या गोष्टींचा हलक्‍या अन्नात समावेश होतो.

"एकादशी, दुप्पट खाशी' नको

उपवासाच्या गोष्टी खाऊन उपवास करायचा असल्यास राजगिऱ्याच्या लाह्या, वरईचा तांदूळ, शिंगाडा, दूध, प्रकृतिनुरूप फळे, थोड्या प्रमाणात साबूदाण्याची खिचडी, थोड्या प्रमाणात उकडलेला बटाटा वगैरे पदार्थ खाता येतात; पण उद्या उपवास करायचा आहे या कारणास्तव आज अधिक खाऊन घेणे योग्य नव्हे; तसेच उपवासाचे पदार्थ चवीला आवडले म्हणून अगदी पोटभर खाणे, पोट जड होईपर्यंत खाणे अयोग्य होय. या प्रकारच्या उपवासातून अनारोग्यास आमंत्रणच मिळू शकते.

एखादी गोष्ट कितीही उत्कृष्ट असली, तरी ती कुणी व कधी करू नये हे माहिती असणे सर्वांत आवश्‍यक असते. उपवास करण्याचे खूप फायदे असले, तरी तो पुढील अवस्थेत न करणे अधिक आरोग्यदायक असते.

क्षयरोग झाला असता.

वातरोग झाला असता.

वातामुळे ताप आला असता.

काम-क्रोध वगैरे मानसिक कारणांमुळे ताप आला असता.

गर्भावस्था असताना.

बाळंतपणाची परिचर्या सांभाळत असताना.

आजारपणात किंवा आजारपणानंतर ताकद कमी झाली असता.

पंचकर्मासारखा शरीरशुद्धीकर उपचार चालू असता.

व्यवहारात बऱ्याच वेळा प्रकृतीला सोसवत नसतानाही मोठमोठे उपवास करण्याचा अट्टहास अनेकांनी धरलेला दिसतो; पण अनारोग्य वाढविणारी कोणतीच गोष्ट सरतेशेवटी स्वहिताची असू शकत नाही. सहन होत नसतानाही नियम म्हणून वर्षानुवर्षे उपवास करत राहणे आणि पोटाला-पचनाला जराही विश्रांती न देता सतत खात राहणे ही दोन्ही टोके टाळून प्रकृतिनुरूप उपवास करण्याचा सुवर्णमध्य साधला तर उपवासातून आरोग्य निश्‍चित मिळू शकेल.
डॉ. श्री बालाजी तांबे

Wednesday, July 1, 2009

आयुर्वेद::मुलांमधील बंडखोरवृत्ती

बुद्धीने चांगल्या असलेल्या, हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांमध्ये अनेकदा बंडखोर प्रवृत्ती दिसून येते. ती त्या मुलांचे नुकसानच करीत असते. त्यामागची कारणे आणि त्यावरील उपचारांची माहिती.

मुलांमधील अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (Oppositional Defiant Disorder)

""डॉक्‍टर, खरं तर मी अमोलसाठी तुमच्याकडे आले आहे. अमोल माझा तेरा वर्षांचा मुलगा. अतिशय हुशार, पण बंडखोर प्रवृत्तीचा. प्रत्येक गोष्टीत वाद घालतो, विरोधाला विरोध करतो. एकही संवाद त्याच्याशी धड करता येत नाही. आमच्या साध्या बोलण्याचं रूपांतरही दरवेळी वादातच होतं. आताही तुमच्याकडे यायला स्पष्ट नकार दिला, म्हणाला, ""मला नाही, तुम्हा पालकांनाच ट्रिटमेंटची गरज आहे.''

काही वेळा मुलांमधली नकारात्मकता मानसिक समस्येचं रूप धारण करते. या समस्येला अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (ODD) असं म्हणतात. अशी बंडखोर प्रवृत्तीची असणारी मुलं त्यांच्या वयाला अपेक्षेपेक्षा जास्त नकारात्मक, आक्रमक, विरोधी आणि आवेशपूर्ण वागतात. या मुलांमध्ये दिसणारी लक्षणं-

खूप वेळा हट्ट व अडमुठेपणाने वागणं.

सतत मोठ्यांशी वाद घालणं.

मुद्दाम अवज्ञा करणं, नियम मोडणं.

मुद्दाम इतरांना राग येईल, चिडचिड होईल वा भांडणाला सुरवात होईल या तऱ्हेने वागणं.

क्षुल्लक कारणांवरून खूप राग येणं, त्यावरून इतरांना उद्धटपणे बोलणं.

स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणं.

सूड घेण्याची वृत्ती.

साधारण पाच ते पंधरा टक्के शाळेतल्या वयाच्या मुलांमध्ये ही समस्या आढळते. या समस्येची ठोस कारणं जरी माहिती नसली तरी मुलाचा मूळचा अडमुठा स्वभाव, पालकत्वाच्या सदोष पद्धती, घरचं वातावरण, अशा अनेक गोष्टी याकरता जबाबदार असतात असं अभ्यासक मानतात. कधी कधी या समस्येबरोबरच मुलांमध्ये, अतिचंचलता, अध्ययन अक्षमता, भावनिक अस्थिरता अशा इतर समस्याही आढळतात.

अशा मुलांना हाताळणं, त्यांच्यावर संस्कार करणं, हे पालकांसाठी मोठंच आव्हान असतं. कारण यांच्या सतत नकारात्मक वागण्याने घरात वारंवार वाद, भांडण होतात, यांच्या विरोधाने चिडून पालक खूप कडक शिस्त लावणं, शिक्षा करणं अशी उपाययोजना करतात; पण त्यामुळे समस्या कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्‍यता जास्त असते. अशा मुलांशी वागताना पालकांनी काही तत्त्व खास करून लक्षात ठेवावी.

या मुलाला सतत हुकूमशाही पद्धतीने "नाही', "नको' म्हणून दडपणं टाळावं.

त्यांना एक व्यक्ती म्हणून आदराने वागवावं.

धमक्‍या, शिक्षा, विशेषतः मारणं किंवा शारीरिक कुठल्याच मुलांसाठी योग्य नाहीत.

पालकत्वामध्ये सातत्य, एकवाक्‍यता आणि ठामपणा हवा. शिस्त लावताना, नियम घालताना मुलांना सामावून घ्या. त्यांना त्यांचा राग योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवा.

अशा मुलांना आणि पालकांना जशी समुपदेशनाची खूप मदत होते, तशीच या मुलांना होमिओपॅथिक उपचारांचाही खूप फायदा होतो. अर्थातच तज्ञ व्यक्तिशिवाय यापैकी काही औषधे -

1) ऍनाकारडियम - मानसिक आंदोलने खूप विरोधी प्रकारची असतात. कधी खूप चांगली कधी खूप विचित्र वागतात. स्वभावात खूप क्रूरता, तिरस्कार दिसून येतो.

2) लायकोपोडिअम - स्वभावाने अहंकारी असतात, उलट उत्तर देणे, आज्ञा न पाळणे, विरोधाला विरोध करणे, अपशब्द वापरणे असा स्वभाव.

3) इग्निशिया - अबोल, घुम्या स्वभावाच्या, व्यक्ती वागण्यात सतत विरोधी प्रवृत्ती दिसतात. रागावलेलं मनाला लावून घेतात. नको म्हटलेल्या गोष्टी मुद्दाम करतात.

याशिवाय हिपाल सल्फ, लॅकेसिस, कॉस्टिकम, मर्क्‍युरी अशी अनेक औषधे लक्षण साधर्म्यावरून देता येतात.

बुद्धीने चांगल्या असलेल्या, हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांमध्ये अनेकदा बंडखोर प्रवृत्ती दिसून येते. ती त्या मुलांचे नुकसानच करीत असते. त्यामागची कारणे आणि त्यावरील उपचारांची माहिती.

मुलांमधील अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (Oppositional Defiant Disorder)

""डॉक्‍टर, खरं तर मी अमोलसाठी तुमच्याकडे आले आहे. अमोल माझा तेरा वर्षांचा मुलगा. अतिशय हुशार, पण बंडखोर प्रवृत्तीचा. प्रत्येक गोष्टीत वाद घालतो, विरोधाला विरोध करतो. एकही संवाद त्याच्याशी धड करता येत नाही. आमच्या साध्या बोलण्याचं रूपांतरही दरवेळी वादातच होतं. आताही तुमच्याकडे यायला स्पष्ट नकार दिला, म्हणाला, ""मला नाही, तुम्हा पालकांनाच ट्रिटमेंटची गरज आहे.''

काही वेळा मुलांमधली नकारात्मकता मानसिक समस्येचं रूप धारण करते. या समस्येला अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (ODD) असं म्हणतात. अशी बंडखोर प्रवृत्तीची असणारी मुलं त्यांच्या वयाला अपेक्षेपेक्षा जास्त नकारात्मक, आक्रमक, विरोधी आणि आवेशपूर्ण वागतात. या मुलांमध्ये दिसणारी लक्षणं-

खूप वेळा हट्ट व अडमुठेपणाने वागणं.

सतत मोठ्यांशी वाद घालणं.

मुद्दाम अवज्ञा करणं, नियम मोडणं.

मुद्दाम इतरांना राग येईल, चिडचिड होईल वा भांडणाला सुरवात होईल या तऱ्हेने वागणं.

क्षुल्लक कारणांवरून खूप राग येणं, त्यावरून इतरांना उद्धटपणे बोलणं.

स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणं.

सूड घेण्याची वृत्ती.

साधारण पाच ते पंधरा टक्के शाळेतल्या वयाच्या मुलांमध्ये ही समस्या आढळते. या समस्येची ठोस कारणं जरी माहिती नसली तरी मुलाचा मूळचा अडमुठा स्वभाव, पालकत्वाच्या सदोष पद्धती, घरचं वातावरण, अशा अनेक गोष्टी याकरता जबाबदार असतात असं अभ्यासक मानतात. कधी कधी या समस्येबरोबरच मुलांमध्ये, अतिचंचलता, अध्ययन अक्षमता, भावनिक अस्थिरता अशा इतर समस्याही आढळतात.

अशा मुलांना हाताळणं, त्यांच्यावर संस्कार करणं, हे पालकांसाठी मोठंच आव्हान असतं. कारण यांच्या सतत नकारात्मक वागण्याने घरात वारंवार वाद, भांडण होतात, यांच्या विरोधाने चिडून पालक खूप कडक शिस्त लावणं, शिक्षा करणं अशी उपाययोजना करतात; पण त्यामुळे समस्या कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्‍यता जास्त असते. अशा मुलांशी वागताना पालकांनी काही तत्त्व खास करून लक्षात ठेवावी.

या मुलाला सतत हुकूमशाही पद्धतीने "नाही', "नको' म्हणून दडपणं टाळावं.

त्यांना एक व्यक्ती म्हणून आदराने वागवावं.

धमक्‍या, शिक्षा, विशेषतः मारणं किंवा शारीरिक कुठल्याच मुलांसाठी योग्य नाहीत.

पालकत्वामध्ये सातत्य, एकवाक्‍यता आणि ठामपणा हवा. शिस्त लावताना, नियम घालताना मुलांना सामावून घ्या. त्यांना त्यांचा राग योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवा.

अशा मुलांना आणि पालकांना जशी समुपदेशनाची खूप मदत होते, तशीच या मुलांना होमिओपॅथिक उपचारांचाही खूप फायदा होतो. अर्थातच तज्ञ व्यक्तिशिवाय यापैकी काही औषधे -

1) ऍनाकारडियम - मानसिक आंदोलने खूप विरोधी प्रकारची असतात. कधी खूप चांगली कधी खूप विचित्र वागतात. स्वभावात खूप क्रूरता, तिरस्कार दिसून येतो.

2) लायकोपोडिअम - स्वभावाने अहंकारी असतात, उलट उत्तर देणे, आज्ञा न पाळणे, विरोधाला विरोध करणे, अपशब्द वापरणे असा स्वभाव.

3) इग्निशिया - अबोल, घुम्या स्वभावाच्या, व्यक्ती वागण्यात सतत विरोधी प्रवृत्ती दिसतात. रागावलेलं मनाला लावून घेतात. नको म्हटलेल्या गोष्टी मुद्दाम करतात.

याशिवाय हिपाल सल्फ, लॅकेसिस, कॉस्टिकम, मर्क्‍युरी अशी अनेक औषधे लक्षण साधर्म्यावरून देता येतात.

सौज्यन्य :ई-सकाळ

Sunday, June 28, 2009

आयुर्वेद:कान आणि आवाज

कानाचे काम ऐकणे व शरीराचा तोल राखण्यास मदत करणे आहे. म्हणूनच कानाशी निगडित विकारांमुळे श्रवणदोष उद्‌भवतो आणि कानफडात मारल्यावर माणसाचा तोल डळमळतो!

वैद्यकदृष्ट्या कानाचे तीन भाग पडतातः बहिर्कर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण. बहिर्कर्णामध्ये कानाच्या पाळीचा व कानाच्या नळीचा समावेश होतो. कानाच्या पाळीचा उपयोग (हाताने धरून पिळण्याव्यतिरिक्त) बाहेरचा आवाज एकत्र करून तो नळीवाटे आत सोडण्यासाठी होतो. बहुतांशी प्राण्यांमध्ये कानाची पाळी हलवून हे ध्वनिग्रहण केले जाते. माणसांमध्ये मात्र स्वतःच्या इच्छेने कानाची पाळी सहसा हलवता येत नाही. कानाची नळी आधी मागे, मग वर अशी वळत जाते. त्यामुळे जोराच्या आवाजापासून तसेच वाऱ्यापासून कानाच्या पडद्याला संरक्षण मिळते. त्या कॅनॉलमध्ये हजारो वॅक्‍स-ग्लॅण्ड्‌स (मेण-ग्रंथी) असतात. त्या हवेतील धूलिकण पकडतात. वॅक्‍स हे वेळोवेळी पडून जात असते. घट्ट झालेला वॅक्‍स सैल करण्यासाठी कानामध्ये करंगळी घालून हलवावी. वॅक्‍स काढण्यासाठी काडेपेटीतील कापूस लावलेली काडी अथवा इअर बड वापरू नयेत. त्यांचा वापर फक्त कानाची पाळी स्वच्छ करण्यासाठी करावा.

कानाचे मुख्य कार्य हे मध्यकर्ण व बहिर्कर्ण करतात. हे दोन्ही भाग आपल्याला दिसत नाहीत. कारण ते कवटीच्या आत असतात. कानाचा पडदा बहिर्कर्ण व मध्यकर्ण यामध्ये ताणून बसवलेला असतो. पडद्याच्या आतील बाजूस हवेचा दाब कमी झाला तर बाहेरील हवेच्या दाबावामुळे पडदा आतल्या बाजूला फुगू शकतो. तसे झाल्यास तो फाटून त्याला भोक पडण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी मध्य कर्णाची पोकळी बंद-उघड होऊ शकणाऱ्या युस्टेशियन ट्यूबमार्फत घशाला जोडलेली असते. हवेचा समतोल बिघडला की आपण आपोआप आवंढा गिळतो. त्यामुळे युस्टेशियन ट्यूब उघडली जाते आणि घशातली हवा मध्यकर्णात जाते व हवेचा समतोल राखला जातो. विमानप्रवासात हवेच्या दाबामध्ये सतत होणाऱ्या चढउताराचा पडद्यावरील परिणाम टाळण्यासाठी आपल्याला चघळायला गोळ्या देतात. त्यामुळे ट्यूब उघडी राहते व कानाला दडे बसत नाहीत.

मध्यकर्णाच्या मोकळ्या जागेमध्ये तीन छोटीशी हाडे असतात. बोटाच्या चिमटीतही न पकडता येणाऱ्या या तीन नाजूक हाडांची नावे हातोडा, ऐरण आणि रिकीब अशी आहेत. ही तीन हाडे एकमेकांना जोडलेली असतात आणि पडद्यापासून आंतरकर्णापर्यंत ध्वनीची कंपने पोचवण्यासाठी ते "सेतू'चे काम करतात. या सेतूमुळे आवाजाचा अंतर्कर्णावर होणारा परिणाम दहापट मोठा होतो. म्हणूनच कर्णकटू आवाज कानावर पडताच या तीन छोट्या हाडांना जोडलेले स्नायू एकदम घट्ट होतात आणि तो आघात आंतर्कर्णाच्या नाजूक दरवाजावर आदळला जात नाही. पण असे आवाज सारखेच आदळत राहिले तर हे स्नायू कायमच आखडलेले राहतात व त्यांची व्यथा डोकेदुखीच्या रूपाने व्यक्त होते.

आंतर्कर्णामध्ये शंख किंवा गुंडाळलेल्या गोगलगायीच्या आकाराचा कॉक्‍लिआ ध्वनिलहरी ग्रहण करून त्यांच्या विश्‍लेषणाचे काम करून त्यांचे रूपांतर मेंदूकडे जाणाऱ्या चैतन्यलहरींमध्ये करतो. तसेच तीन अर्धवर्तुळाकार कॅनॉल आणि त्याला जोडलेले व्हेस्टिन्यूल यांचे कार्य शरीराच्या स्थिर व चल अवस्थेत तोल सांभाळणे हे असते. कॉक्‍लिआ सरळ केल्यावर त्याच्या एका बाजूला पडद्यावर आलेल्या ध्वनिलहरींची स्पंदने पोचवणारे रिकीबीचे हाड असते. या स्पंदनांमुळे कॉक्‍सिआमधील द्राव हलतो व त्याचा परिणाम होऊन आतील केशपेशी (हेअरसेल्स) हलतात. त्यांचे हलणे त्यांच्याच बुडाशी असणाऱ्या मज्जातंतूंमध्ये चैतन्य निर्माण करते आणि हाच करंट "ऑडिटरी नर्व्ह'मार्फत मेंदूचा आवाज ओळखून त्याचा अर्थ लावणाऱ्या भागाकडे पाठविला जातो.

आवाजाच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे आंतर्कर्णातील वेगवेगळ्या केशपेशी उत्तेजित होतात. आवाजाच्या "व्हॉल्यूम'प्रमाणेही त्यांचे प्रतिसाद बदलतात. विशिष्ट केशपेशींच्या हालचालींमुळे नेमक्‍या श्रुतींचे ग्रहण होते. ध्वनीच्या प्रत्येक गुणधर्माप्रमाणे केशपेशींचा प्रतिसाद बदलतो आणि त्यामुळेच आवाजाचे सूक्ष्मातिसूक्ष्म विश्‍लेषण शक्‍य होते. ही विश्‍लेषणाची प्रक्रिया नैसर्गिक असली तरी त्याचे ग्रहण होण्यासाठी व ते स्मृतींच्या रूपात टिकून राहण्यासाठी एकचित्त होऊन दीर्घ काळ श्रवण करणे महत्त्वाचे असते. त्यामुळेच "कान तयार होऊन' कानसेन होता येते. काही थोड्या भाग्यवंतांना अत्यंत अल्पावधीतच हे "स्वरज्ञान' प्राप्त होते. संगीताची उपजत जाण असणे हे त्यामुळे बालवयातच दिसून येते.

ध्वनिप्रदूषणामुळे त्या त्या फ्रिक्‍वेन्सीचे हेअर-सेल्स मरून बहिरेपण येऊ लागते। जन्मतः कर्णबधिर असणाऱ्यांमध्ये कॉक्‍लिआपासून मेंदूकडे संदेश पोचवणारी यंत्रणा निकामी असते. सर्वसाधारणतः बधिरपणामुळे मूकत्व येते. यावरून आवाज निर्माण करण्यासाठी आवाज ऐकण्याचे महत्त्व लक्षात येते.

सौजान्य:ई-सकाळ

आयुर्वेद:बिनमधमाशीचा मधाचा बांबू

चरकसंहिता "पौण्ड्रक' आणि "वंशक' या दोन प्रकारच्या उसांचा उल्लेख करते. पैकी पौण्ड्रक' अधिक श्रेष्ठ दर्जाचा, असेही नोंदविते. उत्तर बंगालमधील प्रदेशाला "पुण्ड्र' देश म्हटले जाई. त्यावरूनच या "ऊस' प्रकाराचे नाव पडले असावे. जैन पद्म पुराणातही याची पुष्टी मिळते. चरकाच्या मते, उसाच्या रसातील अन्यद्रव्ये जितकी काढावीत तितकी शर्करा "शुभ्र' व "शीत' आणि "जड' बनते.

माणसाच्या खाद्यविश्‍वात "गवत'वर्गी वनस्पतींची मातब्बरी उघड आहे. पण धान्य देणाऱ्या तृणांखेरीज आणखी दोन गवतांचे स्थान फार लक्षणीय आहे. ही दोन "अजब आणि अफाट' गवते म्हणजे बांबू आणि "ऊस'. पैकी बांबू खाण्यापेक्षाही अन्य उपयोगांमध्ये अधिक प्रबळ, पण ऊस या पोएसीकुलीन गवताची मोहिनी फार प्राचीन आणि सर्वव्यापी आहे. अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी आशिया खंडात मोजकेपणी पसरलेल्या या "गवता'ची लागवड आता जवळपास १७०-१७५ देशांमध्ये केली जाते. फार पूर्वी या गवताचे रानटी पूर्वज गियाना बेटांमध्ये आणि भारताच्या काही पूर्व व उत्तर भागामध्ये आढळायचे. साक्‍खारूम एड्यूल आणि साक्‍खारूम ऑफिकिनाकुम या प्रजाती गियाना बेटामध्ये, तर "साक्‍खक्रूम बार्बेर' प्रजातीचा आढळ भारतीय खंडात असे.

परंतु या गवताच्या अंगीचा रस आणि त्यापासून उपजलेली "शर्करा' ही निर्विवादपणे भारतीय उपखंडाची देणगी आहे. गणितातल्या शून्याशी तुलना करण्याजोगते हे योगदान सर्व जगभर दृढावलेले आढळते. जगातल्या अनेक भाषांमधला "साखरे'साठीचा शब्द "शर्करा'पासून निपजला आहे. (तमीळमध्ये साखरेसाठी "अक्कारम्‌' असा शब्द आहे.) उदा.- अरेबिक व फारसी भाषेतला "शकर', जवळपास त्याच उच्चाराचा रशियन "शकर', "लॅटिन स्यूक्र किंवा जर्मन झ्युकर किंवा "खांड', "खंड'चा फारसी "कन्द', इंग्रजीतली कॅंडी, उसापासून साखर निष्पन्न करण्याची कला कधी किती विकसित झाली याचा फक्त ढोबळ अंदाज करता येतो. ऋग्वेदात उसाचा- म्हणजे "इक्षु'चा- उल्लेख नाही; परंतु काही विद्वानांच्या मते, "कुसर' गवत हे उसाचाही निर्देश करणारे असावे. अथर्ववेदामध्ये ऊस चावून खाण्याचा उल्लेख आहे, तसाच यजुर्वेदामध्येही आढळतो. बहुधा भारतातल्या आदिदाक्षिणी लोकांमध्येच उसापासून "शर्करा' बनविण्याचे तंत्र इतर समूहात पसरले, सूत्रकाळाच्या आसपास उसाच्या रसापासून बनणारा "गुड' चांगलाच प्रचलित आणि स्थिरावला असावा. अनेक गृहधर्मकृत्यांत त्याचा वापर आढळतो. पाणिनीमध्ये "गुडा'बरोबर "फाणित' (म्हणजे जुन्या हिंदीतला' राबा', मराठीतली काकवी, आणि शर्करा यांचाही उल्लेख आढळतो. "गुड' या शब्दापासून "गौड'ची व्युत्पत्ती त्याने सुचविली आहे. त्यावरून आजचा बिहार व बंगाल हे त्याचे मूळ ठिकाण असावे. नंतरच्या बुद्धकालीन वाङ्‌मयातही गुडाचा उल्लेख आढळतो. "गुड' ऊर्फ गूळ हेच साखरेचे पहिले रूप. परिणामी, अनेक "धर्मकृत्यां'मध्ये कितीही "शुद्ध' असली तरी साखर नव्हे, तर "गूळ'च आढळतो.

उसांचे बारा प्रकार

चरक संहिता "पौण्ड्रक' आणि "वंशक' या दोन प्रकारच्या उसांचा उल्लेख करते. पैकी पौण्ड्रक' अधिक श्रेष्ठ दर्जाचा, असेही नोंदविते. उत्तर बंगालातील प्रदेशाला "पुण्ड्र' देश म्हटले जाई. त्यावरूनच या "ऊस' प्रकाराचे नाव पडले असावे. जैन पद्‌म पुराणातही याची पुष्टी मिळते. चरकाच्या मते, उसाच्या रसातील अन्य द्रव्ये जितकी काढावी तितकी शर्करा "शुभ्र' व "शीत' आणि "जड' बनते. चरक संहितेनंतर चार शतकांनी घडलेल्या सुश्रुत संहितेमध्ये उसांचे बारा प्रकार नोंदलेले आढळतात. हा भारतखंडातील उसाचा प्रसार आणि प्रसारकाळात उद्‌भवलेला संकर अथवा उत्परिवर्तनाचा द्योतक असावा. त्यातील काही अगोदरच्या प्रकारामधून वेचलेले प्रकारही असावेत. उदा.- "भीरुक' जातीचा ऊस गुणधर्मदृष्ट्या पौण्ड्रक उसासारखाच असतो किंवा "श्‍वेतपोरक उसाचे गुण वंशक उसासारखेच असतात,' ही विधाने उसाच्या वाढीमध्ये फरक असल्याने "ऊस बुडख्याकडे अतिशय गोड, मध्यभागी मधुर आणि शेंड्याकडे व डोळ्यांच्या ठिकाणी किंचित खारट असतो,' असे सुश्रुताने नोंदले आहे.

त्यातली विशेष नोंदण्यासारखी गोष्ट म्हणजे रस काढण्याच्या "यंत्रा'चा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. घाण्याने काढलेल्या रसांचे गुण चावून खाल्लेल्या "रसा'पेक्षा विभिन्न असतात. घाण्याचा रस अधिक जड, विदाही आणि वाताचा अवरोध करणारा असतो (गुरुर्विंदाही विष्टम्भी यांत्रिकस्तु प्रकीर्तितः). उसाचा रस काढणे ही मोठी किचकट व चिकाटीची प्रक्रिया असते. एकेकाळच्या "उलखलु' या पाटा-वरवंटावर्गी यंत्रामुळे आणि मुबलक मानवी श्रमांमुळेच ते पूर्वी शक्‍य असे. उलुखल हा "उखळ' आणि "कोलू' या दोन्हीशी संबंधित शब्द आहे. त्यानंतर तो रस उकळून "स्वच्छ' करणे याकरिता आता वापरली जाणारी "गंधकक्रिया' तेव्हा उपलब्ध नसावी. आजघडीलादेखील गुऱ्हाळांमध्ये रसाच्या आधणामध्ये मळ साचवून एकवटणाऱ्या वनस्पतींच्या छोट्या फांद्यांचे झुबके चेचून टाकतात. एरवी निरुपयोगी म्हणून हिणविलेले भेंडीचे झाड या कामी मात्र येते! हा साफ केलेला रस "किती साफ' आहे आणि कसा थंड होतो, यावर "गूळ' ते निरनिराळ्या रूपगुणांची साखर, हे रूपांतर अवलंबून असते. "राब' (काकवी), गूळ, भुरा, खांडसर, "खाण्ड' हे शब्द या परिवर्तनाच्या प्रकारानुसार पडले. अगदी साफ स्फटिकीकरणाच्या कडा उमटलेली साखर म्हणजे "खांड'. वस्त्रगाळ करत परातीत सतत हलवत रव्यासारखी होणारी पण मोठ्या करपट गुळी गुठळ्या आढळणारी साखर, माशांची गाभोळी (अंडी) असावीत तसे स्फटिकीकरण झालेली साखर, (त्याला "मत्संडिका शर्करा' म्हणत) अशा अनेकविध अवस्थांतरी तऱ्हा प्रचलित होत्या. चौकोनी दाणेदार घनाकृती स्फटिक ही अगदी अलीकडची रुळलेली हौस. अजूनही इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया, अरबस्तान भागामध्ये साखरेचे खांड म्हणजे मोठमोठे खडे विकले- वापरले जातात. ते फोडायचे वेगळे "अडकित्ते'ही असतात.

सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी युरोप-अमेरिकेतील साखरही मुख्यतः अशी "खडकाळ'च असायची. युरोप आणि अमेरिकेला साखरेची मोठी टंचाई होती. (भारत खंडाच्या मानाने फारच!) या "ऊस' गवताने युरोपीय फार चक्रावले, मोहात पडले. अलेक्‍झांडरबरोबर आलेल्या याने मोठ्या आश्‍चर्याने लिहिले आहे, "इथे एक प्रकारचा बांबू असतो. अगदी मधाने पूर्ण भरलेला. पण तरी त्याभोवती एकसुद्धा मधमाशी नसते!'

आयुर्वेद :काळजी मधुमेहाची

'मधू' म्हणजे मधुर किंवा गोड व 'मेह' म्हणजे बहूमूत्रता. म्हणजे ज्या व्यक्तीस वारंवार व मधुर अशी मूत्रप्रवृत्ती होते, त्यास मधुमेह असे म्हणतात. या विकारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त फिल्टर होऊन तयार होणाऱ्या मूत्रातही शर्करेचे प्रमाण आढळते व ते मधुर होते.

मधुमेह किंवा डायबेटिस हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्शुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते.

जर इन्शुलिन तयारच झाले नाही किंवा कमी प्रमाणात तयार झाले तर ग्लुकोज पेशीमध्ये जाऊच शकत नाही. परिणामी व्यक्तीस थकवा जाणवतो.

काही रुग्णांमध्ये अन्नाशयात इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशीच नष्ट होतात. त्यामुळे शरीरात इन्शुलिन तयारच होत नाही व मधुमेह होतो, तर काही रुग्णांमध्ये इन्शुलिन तयार होते; परंतु शरीरातील पेशी त्याचा स्वीकार करण्यास तयार नसतात. त्यामुळे ग्लुकोज पेशीकडून वापरले न गेल्याने रक्तातील त्याचे प्रमाण वाढते व डायबेटिस होतो.

शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीतील विकृती, व्याधिशमत्व प्रणालीतील विकृती किंवा आनुवंशिक विकृतीमुळे डायबेटिस होतो.

1) अन्नाशय ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे. त्यात बिघाड झाल्यास डायबेटिस होतो.

2) विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे शरीरात अशी प्रतियोगी द्रव्ये (Antibodies) तयार होतात, की ही द्रव्ये व्याधी प्रतिकार करण्याऐवजी विशिष्ट पेशीच नष्ट करतात व डायबेटिसमध्ये या विषाणू हल्ल्यात अन्नाशयातील इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात.

3) आनुवंशिक विकृतीत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत त्याचे वहन होते. हा एक बीजदोषच आहे.

मधुमेहाचे शरीरावर परिणाम

मधुमेहास Silent Killer असे म्हणतात. कारण यात रक्तातील साखर वाढणे एवढेच जरी व्याधीचे स्वरूप दिसत असले, तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. ही रक्तातील वाढलेली शर्करेची पातळी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर खूप खोलवर परिणाम करते व तुमचा आरोग्याचा स्तर खालावतो.

वाढलेल्या साखरेचे परिणाम - 1) पचन संस्था, 2) रक्तवह संस्था, 3) त्वचा, 4) अस्थी, 5) श्‍वसन संस्था, 6) प्रजनन संस्था, 7) मूत्रवह संस्था, 8) व्याधिशमत्व प्रणाली या सर्वांवर होतो. म्हणूनच यात योग्य औषधे व पथ्य पाळणे खूप आवश्‍यक असते.

1) यात शरीरातील तसेच त्वचागत जलीय धातू कमी होऊन त्वचा शुष्क होणे, वारंवार तहान लागणे, कांती नष्ट होणे, भेगा पडणे, हे त्वचा विकार उत्पन्न होतात.

2) मधुमेहात रक्तसंवहनात येणारे अडथळे, नर्व्ह डॅमेज, स्थौल्य यामुळे संधिवाताचीही शक्‍यता वाढते.

3) वाढलेल्या शर्करेचे प्रमाण अधिक काळ रक्तात तसेच राहिले तर रक्त फिल्टर करणाऱ्या किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही व किडनी निकामी होते.

4) डायबेटिसमध्ये कर्बोदके, प्रथिने व चरबी यांच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यात तयार झालेली विषद्रव्य रक्तवाहिन्यांमध्ये संचय पावतात. परिणामी रक्तवाहिन्यांत अडथळा येतो व हृदयविकार किंवा रक्तदाबासारखे आजार ओढावतात.

5) मधुमेहामुळे डोळ्यांतील रेटायना या भागावर असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने अंधुक दिसणे, डोळे दुखणे, जड पडणे अशा दृष्टीशी व डोळ्यांशी निगडित तक्रारी असतात.

6) डायबेटिसमध्ये किडनीवर परिणाम झाल्याने रक्तातील विषद्रव्य बाहेर फेकली जात नाहीत. त्याचा परिणाम मेंदू व यकृतावर होतो, तसेच मेंदूच्या नसांमधील पेशी एकदा नष्ट झाल्या की पुन्हा तयार होत नाहीत व त्याचा पुरवठा असणारा भाग कायमचा विनाश पावतो व मधुमेही रुग्णात हा पेशीनाश लवकर होतो.

म्हणूनच मधुमेही रुग्णाने गाफील न राहता औषधे, व्यायाम, पथ्य, जेवणाच्या वेळा, पायी चालणे या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजेत.

मधुमेही रुग्णाचा आहार

या रुग्णांचा आहार हेदेखील एक औषधच आहे. मधुमेहींनी औषधाप्रमाणेच आहाराचेही काटेकोर पालन करणे आवश्‍यक आहे.

या रुग्णांचा आहार हा रुग्णाचे वजन, वय, त्याची शारीरिक हालचाल, मधुमेहाचा प्रकार, त्याच्या व्यवसायाचे स्वरूप यावरून ठरवावा.

रुग्णाने रोजच्या आहारात पाळावयाच्या गोष्टी -

1) आहारातील कर्बोदकाचे प्रमाण मर्यादित असावे.

2) रेषायुक्त (फायबर्स) पदार्थ आहारात असावेत.

3) बेकरीचे पदार्थ व फास्ट फूड्‌सचा आहारातील वापर टाळावा.

4) ताजी फळे व भाज्यांचा आहारात वापर असावा.

5) झोपण्यापूर्वी अडीच ते तीन तास आधी जेवण घ्यावे.

6) दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा 3-4 तासांनी थोडाथोडा आहार घ्यावा.

7) आहार हा कमी कॅलरीज असणारा, परंतु परिपूर्ण पोषकांश असणार असावा.

8) प्रत्येक मधुमेही व्यक्तीस एकच आहार नसतो. तसेच तोच तोच आहार खूप दिवस चालू ठेवणेही अपायकारकच. म्हणून आहारात वैविध्य असावे.

9) शक्‍यतो कृत्रिम साखर वापरणे टाळावे.

मधुमेहाचे रिस्क फॅक्‍टर्स व त्याची लक्षणे

रिस्क फॅक्‍टर्स

1) स्थूलता - आवश्‍यक वजनापेक्षा जास्त वजन असल्यास मधुमेहाची शक्‍यता 20% जास्त असते. आवश्‍यक वजनापेक्षा जेवढे जास्त वजन असेल तेवढी मधुमेहाची शक्‍यता वाढत जाते.

2) वय 40 वर्षांनंतर मधुमेहाचा धोका वाढत जातो. चाळिशीनंतर वजन कमी असो किंवा जास्त असो, मधुमेह होण्याचा धोका जास्तच असतो.

3) अन्नाशयास वारंवार येणारी सूज इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींवर परिणाम करते व मधुमेहाची शक्‍यता अशा रुग्णांमध्ये वाढते.

4) काही औषधांच्या अधिक सेवनानेही मधुमेह होऊ शकतो. उदा. स्टिरॉईड्‌स. म्हणूनच वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधी उपाययोजना करू नये.

5) गरोदरपणा ः यात मधुमेहाची शक्‍यता असते. परंतु हा मधुमेह तात्पुरता असतो व प्रसूतीनंतर तो बरा होतो.

मधुमेह लक्षणे

1) वारंवार व भरपूर प्रमाणात होणारी मूत्रप्रवृत्ती

2) खूप तहान लागणे, घसा कोरडा पडणे, नाक शुष्क होणे

3) वजन अचानक घटणे किंवा वाढणे

4) सतत थकवा जाणवणे, आळस वाटणे, कामात उत्साह न जाणवणे

5) मळमळ होणे, उलटी, अपचन यांसारखी लक्षणे

6) वारंवार त्वचेचे, मूत्रवह संस्थेचे किंवा स्त्रियांना योनीमार्गाचे विकार होणे

7) स्त्रियांमध्ये श्‍वेतप्रदर, योनीमार्गात कंड अशा तक्रारी.

8) प्रथिने व कर्बोदकाच्या पचनावर परिणाम

9) अंधूक दिसणे, डोळे दुखणे

10) पाय दुखणे, पोटऱ्या ओढणे

वरील लक्षणे दिसत असल्यास किंवा आपण रिस्क फॅक्‍टरमधील कोणत्या फॅक्‍टरमध्ये असू तर सर्वप्रथम रक्तातील शर्करचे प्रमाण तपासून बघावे.

मधुमेह चिकित्सा

आयुर्वेदानुसार याची चिकित्सा 2 प्रकारे करतात. 1) शमन, 2) शोधन चिकित्सा

शमन चिकित्सा - शमन चिकित्सा म्हणजेच औषधी चिकित्सा. यात निरनिराळ्या काष्ठौषधी, रसौषधींचा उपयोग करतात. गुडूची, आवळा, हरिद्रा, त्रिफळा, मुस्ता, मेथ्या तसेच गुग्गुळ कल्प व व्याधीचे बलाबल बघून वसंत कल्प या अशा अनेक कल्पांची उपाययोजना करतात.

शोधन चिकित्सा - शोधन म्हणजे शरीराची शुद्धी. मधुमेही रुग्णात वमन व बस्तीसारख्या शोधन चिकित्सेने शरीराचे उत्तम शोधन होते व व्याधी आटोक्‍यात राहण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार प्रमेह हा कफदोषाचा व्याधी सांगितला आहे. त्याची व्याख्या करतानाच "बहुद्रव श्‍लेष्मा' अशी केलेली आहे व कफावर आयुर्वेदात वमन चिकित्सा देतात, तसेच बस्ती चिकित्सेनेही धातूंची शुद्धता होते. त्यातील क्‍लेद नाहीसा होतो. धातूंचे शोधन होते व त्यांचे उत्तम संहनन होते.

म्हणूनच वमन व बस्ती ही चिकित्सा वर्षातून एकदा तरी किंवा व्याधीचे बलाबल बघून करावी.

आजकालच्या प्रचलित औषधाने रक्तातील "शुगर लेव्हल' नियंत्रित राहते; परंतु वजन घटणे, पाय, पोटऱ्या दुखणे, थकवा जाणवणे, पचनातील बिघाड, अंधुक दिसणे या तक्रारी तशाच राहतात.

परंतु आयुर्वेद चिकित्सेने रक्तातील शर्करेचे प्रमाण केवळ नियंत्रित ठेवणे एवढाच उद्देश नसून शरीरात इन्शुलिनचा पेशींचा स्वीकार वाढविणे तसेच अनियंत्रित शर्करेचा जो परिणाम डोळे, त्वचा पचन संस्था, इत्यादी अनेक संस्थांवर झाला आहे, त्याचाही परिणाम हळूहळू नाहीसा करून उत्तम आरोग्याचा दर्जा ठेवणे हे आयुर्वेद चिकित्सेचे मुख्य ध्येय आहे. यात केवळ लाक्षणिक चिकित्सा न देता शरीराचे शोधन करून शरीरातील विषद्रव्य बाहेर काढतात व त्यामुळेच केवळ रक्तातील साखरेचे प्रमाणच नियंत्रित राहते असे नसून, अशा रुग्णांना जाणवणारा थकवा, पाय दुखणे, वजन घटणे, तहान लागणे या तक्रारीही नाहीशा होतात.

आयुर्वेदिक औषधे व्यवस्थित व नीट पथ्य पाळून घेतली तर काही रुग्णांचे इन्शुलिन इंजेक्‍शन बंद होते

सौजन्य:ई-सकाळ

आयुर्वेद: भाज्यांचे आयुर्वेदिक गुण

काही भाज्यांचे आयुर्वेदिक गुण


कोहळा

कुष्माण्डं बृंहणं वृष्यं गुरु पित्तास्रवातनुत्‌ ।

बालं पित्तापहं शीतं मध्यमं कफकारकम्‌ ।।

वृद्धं नातिहिमं स्वादु सक्षारं दीपनं लघु ।

बस्तिशुद्धिकरं चेतो रोगहृत्‌ सर्वदोषजित्‌ ।।

...भावप्रकाश

कोहळा पुष्टिकर, शुक्रधातुपोषक, पित्त व वातदोष कमी करणारा असतो आणि तो रक्‍तदोषातही हितावह असतो. अगदी कोवळा कोहळा पित्तशामक व शीत गुणधर्माचा असतो. मध्यम कोहळा कफ वाढवतो. पिकलेला कोहळा फार थंड नसतो, पचायला हलका असतो, स्वादिष्ट असतो, अग्नी प्रदीप्त करतो, मूत्राशयाची शुद्धी करतो, मानसिक रोग दूर करतो व त्रिदोषांना जिंकतो.

काकडी

कर्कटी शीतला रुक्षा ग्राहिणी मधुरा गुरु ।

रुच्या पित्तहरा सामा पक्वा तृष्णाग्निपित्तकृत्‌ ।।

...भावप्रकाश

काकडी वीर्याने थंड, चवीला गोड, थोडी रुक्ष असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रुचकर असते, कच्ची म्हणजेच कोवळी काकडी पित्तशामक असते, मात्र पिकलेली काकडी पित्त वाढवते व तहान उत्पन्न करते.

तोंडली

बिम्बीफलं स्वादु शीतं गुरु पित्तास्रवातजित्‌ ।

स्तम्भनं लेखनं रुच्यं विबन्धाध्मानकारकम्‌ ।।

...भावप्रकाश

तोंडली चवीला स्वादिष्ट, शीत वीर्याची व पचायला जड असते, मात्र पित्तदोष व कफदोष कमी करते, अतिरिक्‍त चरबी कमी करते, रुचकर असते मात्र थोड्या प्रमाणात गॅसेस व मलावष्टंभ करू शकते.

तोंडलीमुळे बुद्धी कमी होते असे निघंटु रत्नाकरात सांगितले आहे. तसेच जीभ जड असणाऱ्या मुलाला तोंडलीची भाजी देऊ नये असा वृद्धवैद्याधार आहे.

कारले

कारवेल्लं हिमं भेदि लघु तिक्‍तामवातलम्‌ ।

ज्वरपित्तकफास्रघ्नं पाण्डुमेहकृमीन्‌ हरेत्‌ ।।

...भावप्रकाश

कारले वीर्याने शीत असते, मलाचे भेदन करते, पचायला हलके व चवीला कडू असते, पित्तदोष व कफदोष कमी करते, रक्‍तदोष कमी करते, योग्य प्रमाणात घेतल्यास पांडूरोग, प्रमेह व कृमीरोगात हितकर असते. मात्र कारल्याचे सेवन अतिप्रमाणात केल्याने वात वाढताना दिसतो. त्यामुळे भाजी म्हणून केलेला कारल्याचा वापर पुरेसा ठरावा.

टिंडा / ढेमसे

डिण्डिशो रुचिकृद्‌ भेदी पित्तश्‍लेष्मापहः स्मृतः ।

शीतलो वातकृत्‌ रुक्षो मूत्रलश्‍चाश्‍मरीहरः ।।

...भावप्रकाश

टिंडा ही एक पथ्यकर भाजी होय. टिंडा चवीला रुचकर असतो, पित्त तसेच कफदोषाचे शमन करतो, वीर्याने शीत असतो, रुक्ष गुणाचा असल्याने वात वाढवतो, मूत्रप्रवर्तनास मदत करतो व मूतखड्यामध्ये हितकर असतो.

कर्टोली

कर्कोटी मलहृत्‌ कुष्ठहृल्लासारुचिनाशनी ।

श्‍वासकासज्वरान्हन्ति कटुपाका च दीपनी ।।

...भावप्रकाश

कर्टोलीची भाजी मलदोष दूर करते, त्वचारोगात हितकर असते, मळमळ, अरुची, दमा, खोकला, ताप वगैरे त्रासात अतिशय हितकर असते, अग्नी प्रदीप्त करते.

भेंडी

भेंडी त्वम्लरसा चोष्णा ग्राही च रुचिकारका ।

राजनामनिघण्टे च द्रव्ये वृष्या परा स्मृता ।।

...निघण्टु रत्नाकर

भेंडी किंचित उष्ण असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रुचकर असते आणि वृष्य म्हणजे शुक्रधातुवर्धक द्रव्यांमध्ये श्रेष्ठ असते।

सौजन्य:ई-सकाळ

Saturday, June 27, 2009

आयुर्वेद:आरोग्यविषयक सर्व काही एका क्‍लिक वर

आरोग्यविषयक सर्व काही एका क्‍लिक वर

इंटरनेटवर आधारित मार्केटिंग करणाऱ्या "आयमार्केटिंग ऍव्हान्टेज'तर्फे www.JustHealth.in हे आरोग्यविषयक समग्र माहिती पुरवणारे संकेतस्थळ सुरू झाले आहे. लॉगिंग केल्यावर डॉक्‍टर्स, हॉस्पिटल्स आणि आरोग्याशी निगडित असणाऱ्या बाबींची माहिती या संकेतस्थळावर मिळू शकेल. या पोर्टलद्वारे माहिती मिळवू इच्छिणाऱ्यांना डॉक्‍टरांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे जाण्याआधीच मिळू शकेल.

या संकेतस्थळाचा नुकताच प्रारंभ झाल्याने त्याची सेवा सध्या केवळ मुंबई आणि दिल्ली या दोन महानगरांनाच मिळणार आहे. पुढील काही महिन्यांतच इतर शहरांमध्येही ही सेवा पुरवण्यात येईल. वर्षभरात ही सेवा देशभर पुरवण्याचा आमचा मानस असल्याचे "आयमार्केटिंग ऍडव्हान्टेज'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन धवन यांनी सांगितले.

या हेल्थ पोर्टलचा उपयोग केवळ चांगल्या डॉक्‍टरांच्या शोधात असलेल्यांना किंवा रुग्णांनाच होईल असे नाही. तर गंभीर आजारासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला हवा असणाऱ्या मंडळींनाही या संकेतस्थळाचा उपयोग होऊ शकेल. केवळ आपल्याच भागातले नव्हे तर इतर भागांतले तज्ज्ञही या संकेतस्थळावरून कळू शकतील. "एखाद्या डॉक्‍टरचा नावलौकिक ऐकला किंवा तशीच वेळ आली आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला नेले, अशी सध्या लोकांची मानसिकता आहे. पण या संकेतस्थळाच्या माध्यमामुळे हा नजारा बदलून जाऊ शकेल. तज्ज्ञ आणि गरजेनुसार हॉस्पिटलची माहिती मिळणार असल्याने परिस्थितीत नक्कीच सकारात्मक बदल होईल,' अशी आशा या संकेतस्थळाचे प्रॉडक्‍ट मॅनेजर आयुष पाहुजा यांनी व्यक्त केली.

डॉक्‍टरांच्या नावावरून, त्यांच्या स्पेशलाइझेशनवरून, लोकेशनवरून आणि डॉक्‍टरांच्या प्रोफाइलचीही मिळणारी ही माहिती मोफत आणि अर्थातच 24 बाय 7 मिळू शकेल. भारतभरातील लाखांहून अधिक डॉक्‍टरांची आणि हॉस्पिटलांची यादी आणि विश्‍वसनीय अशी आरोग्याशी निगडित इतर सेवांची माहिती या संकेतस्थळावरून मिळू शकेल. डॉक्‍टर आणि हॉस्पिटलला पोहचण्यासाठी नकाशे आणि दिशादर्शक आकृत्यांचाही या संकेतस्थळावर समावेश करण्यात येणार आहे. शिवाय हेल्थकेअर डिरेक्‍टरी सर्व्हिस, आरोग्यविषयक लेख आणि बातम्या, औषधे, इन्शुरन्स आदी आरोग्याशी निगडित बाबी या पोर्टलवर असणार आहेत. लोकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे निर्माण होणारी वेळेची समस्या सोडवण्यासाठी नोंदणीकृत सदस्यांसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट, पर्सनल हेल्थ केअर रेकॉर्ड ट्रॅकिंग, रिमाइंडर, ऍलर्ट सर्व्हिस, रुटिन चेकअप आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत।


सौजान्य:

ई-सकाळ

आयुर्वेद::मोर्निंग वाक्

हे शीर्षक वाचुन कुणीही – 'Oh not again' अशीच प्रतिक्रिया दील!. लवकर उठणे, (थंडीच्या दिवसात तर उबदार दुलईच्या कोषातून बाहेर पडायची नुसती कल्पनासुद्धा नकोशी वाटते), वजन, सक्ती, mind body fitness, निवृत्ती, वय, मनाचा प्रतिकार अशा अनेक भावना बहुतांशी लोकांच्या मनात या मॉर्निंग वॉकशी निगडीत असतात. मला मात्र सकाळच्या या फेरफटक्याने नेहमीच आकर्षित केलय. असं का बरं असावं? म्हणतात ना ‘The first impression is the lasting one’ - प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनात आपल्याला आलेला पहिला अनुभव फार महत्वाचा ठरतो. तो जर सकारात्मक असेल, तर आपण तशा अनुभवांना अगदी सहज आनंदाने स्वीकारतो. माझे काहीसे तसेच झाले असणार.

माझ्या आयुष्यात मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली ती आजोबांचा हात धरुन ... साडेतीन चार वर्षांची असल्यापासुन ... रोज सकाळी त्यांच्याबरोबर पुढेमागे बागडत आम्ही भाऊ-बहीण जात असू. त्यांच्या नित्यनव्या गोष्टी ऎकायला मिळण हे सर्वात मोठ आकर्षण. किती भव्य दिव्य वाटायचा उगवणारा सूर्य - चारी दिशा उजळून टाकणारी त्याची किरणे आमच्या बालमनाला अवाक् करुन टाकायची. 'आपली सगळी शक्ती तो सुर्यनारायण आपल्याला देतो', आजोबा सांगायचे. रोज नव्या वाटा आणि त्याबरोबर नवे अनुभव. पक्षी, प्राणी, झाडे-फुले प्रत्येकाची माहिती त्यांच्याकडून मिळायची. सगळ्यात पहिल्यांदा अनेक कोंबड्या आणि बदकांमध्ये पाहिलेली टर्की मला अजून आठवते! कोण आनंद झाला होता मला त्या दिवशी - एखादी नवीन अद्भुत गोष्ट पाहिल्याचा.
बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मोठाले सिमेंटचे पाईप ठेवलेले असायचे. मी आणि माझा भाऊ त्यात गेल्याशिवाय रहायचो नाही. फिरायला जायच्या वाटेवरच आमच ते 'घर'होत! किती मजा येईल अशा घरात रहायला. आजोबा आम्हाला वेगवेगळ्या घरांबद्दल सांगायचे - सिमेंटची, लाकडाची, विटांची आणि बर्फाची घरं ... माझं मन त्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या घरात बागडून यायचं. एक ना दोन ... अशा कितीतरी सुंदर आठवणी त्या सकाळच्या मंगलप्रहरांशी सांधलेल्या आहेत. पाऊस पडून गेल्यावर साचलेल्या पाण्यात पाहिलेल स्वत:चं 'प्रतिबिंब'हा आजोबांनी शिकवलेला नवा शब्द! दिवसभर मी तो घोकत होते. प्रेमातच पडले होते जणू त्याच्या की आपल्याच?

सुट्ट्यांमध्ये आम्हा चुलत आत्तेभावंडांची सकाळ आजोबांच्या मॉर्निंग वॉकने व्यापली जायची! टेकड्यांवरुन झाडाझुड्पातून मुंग्यांची वारुळं, किड्यांची मातीतली घरं, मधमाशांची पोळी, झाडांच्या फांद्यांवर त्यांच्या रंगात बेमालुमपणे मिसळून स्तब्ध पहुडलेले सरडे, सूर्य़प्रकाशात अवचित दृष्टीस पडलेल सुंदर कोळ्यांच जाळ ... निसर्गाची किमया आम्हाला थक्क करुन टाकायची! आजोबा आम्हाला पळसाची पान गोळा करायला सांगायचे - पत्रावळीसाठी कशी पाने हवीत, द्रोणांसाठी कोणती निवडायची - ती टाचण्यासाठी टाचण गोळा करायचं. घरी आल्यावर द्रोण, पत्रावळी बनवण्याचा प्रशिक्षण वर्ग भरायचा. वेड्या वाकड्या असल्या तरी स्वत: तयार केलेल्या पत्रावळीवरच्या जेवणाची चव औरच! दारातच मोठ प्राजक्ताच झाड होत. आजोबांबरोबर फिरून आल्यावर आम्ही सर्व मुलं घरातून रोळ्या आणून फुलं गोळा करायचो. 'टप टप पडती अंगावरती ...' चा अनुभव देणारे आजोबाच. गोळा केलेल्या फुलांच्या देवघरात रांगोळ्या काढ्ल्या जायच्या. रोज नवीन ... पारिजातकाच्या नाजुक फुलांच्या मंद सुवासाच्या आठवणी त्या मॉर्निंग वॉकशी जोडलेल्या आहेत ... पवित्र आणि सात्विक.

आश्चर्य म्हणजे या मॉर्निंग वॉकनी माझा आणि मी त्याचा पिच्छा कधीच सोडला नाही! शाळेतल्या मित्र मैत्रिणिंबरोबर सुट्ट्यांमधला तो आमचा अगदी आवडीचा कार्यक्रम असायचा! उन्हाळ्यात अंगावर सकाळचे गार वारे घेत आम्ही सर्व मंडळी घराजवळची टेकडी चढत असू. अगदी वर पोचल्यावर धावत खाली कोण आधी येतं ह्याची शर्यत लागत असे! त्या काळी सुट्ट्यांमधली प्रशिक्षण शिबीर संस्कारवर्ग नव्हते ... मुलांच्या मुक्त मनांना बांध घालायला! टेकडीवर उमलणारी ती रानटी सूर्यफुलं किती आनंदात डोलायची! एरवी रुक्ष दिसणाऱ्या त्या टेकडीवर या शेकडो फुलांच हे पिवळ जर्द पांघरुण कसं तयार होतं याचं आम्हाला नेहमीच कुतूहल वाटायचं. पुढे वर्ड्स्वर्थची Daffodils शिकताना त्याने रेखाटलेले चित्र मला सहज डोळ्यांपुढे साकारता आले!

शाळा कॉलेजात जरा बॅकसीटच घेतलेल्या माझ्या या दोस्ताशी परत भेट शिक्षण संपताच झाली ती वडिलांबरोबर. आपल्यापेक्षा वयानी जास्त असून ते इतक्या भरभर कसे चालू शकतात . मग त्यांनी धाप न लागता, न दमता झपझप चालायचे टेक्निक शिकवलं. कित्येक विषयांवर आमची देवाण घेवाण त्या वेळात होत असे. दोन पिढ्यांमध्ये संवाद साधायची किती सुंदर संधी या सकाळच्या फेरफटक्यामुळे मिळाली!

पुढे लग्न, संसार, मुले, नोकरी ही सगळ्यांच्या पदरी पडणारी कसरत मलाही चुकली नाही. पण गम्मत म्हणजे मुलं (जुळी!) अगदी लहान असताना दिवसभराची दमछाक, रात्रीची जागरणं या सगळ्यामुळे मरगळलेल्या शरीराला तजेला द्यायचा तो मॉर्निंग वॉकच! 'अहो, तुम्हाला वेळ तरी कसा होतो?' हा सगळ्यांना पडलेला प्रश्न! पण खरं सांगू ... त्या सकाळच्या वीस पंचवीस मिनीटांच्या (तेवढीच देऊ शकत होते) झपझप चालण्याने आणि त्याहूनही आधिक ती 'सकाळ'अनुभवल्याने शरीर आणि मन दिवस पेलायला फिट्ट व्हायच!

पुढे पुण्यात आलो ... सकाळच्या या फेरीत वेगवेगळ्या वळणांवरचे बहरणारे वृक्ष टिपायचा मला छंद जडला. ग्लिसरीडियाचे एरवी तापदायक वाटणारे रान आपल्या नाजूक फुलांनी बहरले की वसंत ऋतुची चाहुल लागायची मग जॅकरेंडा, बहावा आणि शेवटी गुलमोहोर! डोळे भरून ती रंगांची उधळण मनाच्या कप्प्यात साठ्वून घ्यायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात आधिकच खुलून दिसणारे ते रंग मग आपोआपच माझ्या जीवनातही उतरू लागायचे! ऋतुप्रमाणे आपली रूपं बदलणारे हे वृक्ष आपल्यासमोर एक रहस्य उलगडु पाहतात ... अविरत बदल हेच न बदलणार सत्य आहे!

नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि त्याबरोबर अनुभवायला मिळणारे पहिल्या प्रहराचे गार मंद वारे, थंडीच्या दिवसात मिळणारी ऊब या सर्वांचा मनावर किती सकारात्मक परिणाम होतो हे प्रत्येकाने अनुभवायलाच हवे! हळुवारपणे जागा होणारा निसर्ग अनुभवा आणि पहा कसा चैतन्यमय होईल तुमचा सबंध दिवस! मला वाटतं, मॉर्निंग वॉकच्या शारीरिक फायद्यांवरच जास्त भर दिला जातो. पण सुदृढ शरीराबरोबरच कितीतरी पटीने जास्त सुद्रुढ मन तयार होतं त्यामुळे! औदासिन्य पळवून लावणारी सूर्याची किरणं मनात उत्साह, चैतन्य आणि हुरूप भरतात ... धरतीच्या कुशीतून डोकावणारा कोंब, दवबिंदू पेलत हळूच उमलणारी एखादी कळी आपल्याला एक नवी आशा दाखवते!

तर मित्रहो .. घेणार ना अनुभव या मॉर्निंग वॉकचा? अगदी चकटफू घेता येणाऱ्या या पॅकेजचे रिटर्न्स भरभक्कम आहेत ... after all,

What is life if full of care

You have no time to stand and stare...



सौजन्य :ई-सकाळ